शिक्षण संस्थांकडून शिक्षणाचा मुळ हेतु भरकटला जाऊ नये -चंद्रकांत पाटील
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दिलबागसिंग बीर आणि चरणजित सिंग सहानी, सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार, फाउंडेशनचे विश्वस्त शैलेश पगारिया , शैलेश वाडेकर, नगरसेवक अरुण राजवाडे, वर्षाताई तापकीर, संदीप बेलदरे, बापू चोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.
सरहदच्या शेजारी शासनाची जागा असून यामध्ये पंधरा हजार चौरस फूट क्षेत्रावर पोलीस स्टेशन उभे राहण्यासाठी सरहद संस्थेने शासन स्तरावर पत्र व्यवहार करत मंजुरी मिळवली. या भागातल्या गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी या ठिकाणी पोलीस स्टेशन आवश्यक असल्याची मागणी सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी यावेळी केली याला प्रतिसाद देत हा विषय मार्गी लावू असे आश्वासन चंद्रकांत पाटलांनी यावेळी दिले. विविध धर्म, पंथ असले तरी माणुसकी हाच प्रत्येक धर्माचा गाभा असून प्रत्येकाने दुसऱ्यांमध्ये देव पहावा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे यावे चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या भाषेमध्ये सांगितले.
मुलांना चांगले शिक्षण मिळावे आणि सीमावर्ती भागातील मुलांसाठी माफक दरात व्यवस्थापन शिक्षण मिळावे या हेतूने ही इमारत बांधण्यात आल्याची माहिती विजय फाउंडेशनचे अध्यक्ष संतसिंग मोखा यांनी यावेळी सांगितले.
संजय नहार यांनी प्रास्ताविक केले.
