Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

“अजितदादा अजिबात पोरके नाहीत. आमच्या सर्वांचं भलं मोठं कुटुंब हेच त्यांचं कुटुंब”- रुईकर

बारामती : “अजितदादांची गरज आम्हाला जास्त आहे. दादा एकटे आमच्यासाठी चिक्कार आहेत . कुटुंब,कुटुंबं काय करताय? दादाचे कुटुंब म्हणजे आम्हीच सर्व आहोत. आणि आमच्या या सर्वात मोठ्या कुटुंबावर घाला घालण्याचा प्रयत्न झाला तर छातीचा कोट करू. वेळच पडली तर दादासाठी जीव देऊ. निवडणुकीचा पेपर कितीबी अवघड आहे, असं भासवण्याचा प्रयत्न केला तरी आमचा अभ्यासच एवढा झालाय, की पहिल्या नंबरात पास होऊ. मागेल तेव्हा लागेल ते दिलं दादांनी. छोट्या छोट्या गावात कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली ती दादांनी. पक्ष, गट, तट, जात, धर्म न पाहता अगदी विरोधकांचेही काम केलं ते दादांनी. दादांच्या पाठीशी लाखोंचे आशीर्वाद आहेत, प्रचंड मोठ्या कामाचे बळ आहे. आणि एक लक्षात ठेवा, दादा अजिबात पोरके नाहीत. आमच्या सर्वांचं भलं मोठं जनकुटुंब हेच त्यांचं कुटुंब आहे. हे कुटुंब त्यांच्या पाठीशी असताना कशाला काळजी करताय? आपणच जिकणार आहोत, आपणच जिंकू.
अशी भावनिक साथ ज्येष्ठ कार्यकर्ते पांडुरंग चोधर आणि माजी नगरसेविका सुरेखा चौधर यांनी सुनेत्रावहिनी पवार यांच्या सदिच्छा भेटीप्रसंगी दिली.

अतिशय उत्स्फूर्तपणे लोक भावना या वेळी व्यक्त करत होते.त्या भावनांनी सारं वातावरण भारून, हेलावून जात आवेशाने पेटून उठले.

अजितदादा जेव्हा विद्या प्रतिष्ठानच्या उभारणीसाठी प्रत्यक्ष साईटवर उभे राहून झिजत, राबत होते. तेव्हा सुनेत्रा वहिनी देखील कधी त्यांच्या सोबत तर कधी दुपारी त्यांच्या जेवणाचा डबा घेऊन यायच्या. दादांना जेवण करायला सवड होईपर्यंत वहिनी अनेकदा रुई गावात यायच्या. त्यामुळे रुईची आणि रूईकरांची त्यांची ओळख तेव्हापासून आहे . तेव्हा जोडले गेलेले त्यांचे ते ऋणानुबंध वेळोवेळच्या त्यांच्या येण्या- जाण्यातून, संपर्कातून, दादांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामातून रुईंकरांशी बांधल्या गेलेल्या गाठी किती घट्ट आहेत हेच सर्वांना दिसून आले.

याप्रसंगी पांडुरंग चौधर यांनी दादांसाठी जीव देखील देऊ, असे सांगितले तर बाळासाहेब चौधर यांनी, दादांनी कधीच कोणाला दुखावले नाही, असे सांगताना उपस्थितांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
या सर्वांसह महिला पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांच्या भावना व्यक्त केल्या

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच रुईचे अध्यक्ष या वेळी म्हणाले कि,”मी जाणीवपूर्वक गांभीर्याने सांगतो, दादा एकटे आहेत असे समजू नका. ते केवढे मोठे, त्यांचे कुटुंब, भावकी केवढी मोठी? याचे दर्शन जेव्हा मतदानातून होईल, तेव्हा दादांना घेरणाऱ्यांचे डोळे दिपतील. हे लिहून घ्या लिहून.” असे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी अजिनाथ चौधर, मच्छिंद्र चौधर, बाळासाहेब चौधर, आबासाहेब चौधर, रामभाऊ पाटील, सत्यवान घाडगे, अतुल कांबळे, दादासाहेब चौधर, साईनाथ चौधर, नवनाथ चौधर, किशोर सावंत, अमर घाडगे, राजेंद्र साळुंखे, संजय साळुंखे, मधुआबा शिरसाट, पपू शेटे यांच्यासह रुई येथील ग्रामस्थ, पदाधिकारी, राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading