घरावर आलेल्या संकटांवर कशी मात करणार श्रेयस आणि अश्विनी ?
प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरणारी ‘तू चाल पुढं’ ही मालिका लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. ही मालिका एका रोमांचक वळणावर आहे. नुकताच आपण पाहिलं की, कश्या प्रकारे उज्वला मयुरीला समजावते कारण ती पार्लर मध्ये येणाऱ्या क्लाइंट्सशी उद्धटपणे बोलते. दुसरीकडे श्रेयसने क्रिकेटचा सामना जिंकल्याने सर्वजण आनंदात आहेत. हे सगळं चालू असतांना श्रेयसच्या बाबांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टर खुलासा करतात व सर्वांनाच धक्का बसतो. आता वाघमारे कुटुंबियांना कोणत्या नवीन संकटाला सामोरे जावे लागणार आहे? अश्विनी स्वतः समोर येणाऱ्या सर्व कठीण प्रसंगांना कश्या प्रकारे हाताळेल, हे पाहणे मनोरंजक असणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका ‘तू चाल पुढं’ सोमवार ते शनिवार संध्या. ७.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर
