Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNE

निसर्गाला जपणे ही भगवंताची श्रेष्ठ पूजा राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे प्रतिपादन

पुणे :  श्रावणात महादेवाला १  लाख बेलाची पाने वाहणे, ही एक शिवाची पूजा सांगण्यात येते. जेव्हा बेलाच्या पानांची उपलब्धी होती तेव्हा संख्येचा आग्रह होता. परंतु काळानुसार व्रतांचे स्वरूप बदलायला हवे. १ लाख बेलांची पाने वाहीन यापेक्षा एक बेलाचे झाड लावीन आणि ते जगवेल हे असा विचार असायला हवा.  निसर्गाला जपणे ही भगवंताची श्रेष्ठ पूजा आहे, असे प्रतिपादन  राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.

चौफेर प्रतिष्ठान, ग्रंथ पारायण दिंडी व कसबा पर्यावरण समितीतर्फे जागतिक पर्यावरण दिन आणि शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने पर्यावरण संरक्षण – वैयक्तिक जबाबदारी आणि शिवराज्याभिषेक ३५० वा सोहळा याविषयावरील  चारुदत्त आफळे यांचे व्याख्यान झाले. यावेळी रा.स्व.संघाचे पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, बाजीप्रभू देशपांडे यांचे थेट वंशज रुपाली देशपांडे, संस्थेचे राहुल भाटे, विरेंद्र कुंटे, निरंजन गोळे, वृंदा जोशी उपस्थित होते.

संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिवराज्याभिषेक सोहळा, जिजाऊंचा शिवबा, माझ्या नजरेतून दिसणारे शिवाजी महाराज अशा विविध विषयांवर ७ ते १५ वयोगटातील मुला-मुलींनी निबंध मराठी व इंग्रजी भाषेत लिहिले आहेत. निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ यावेळी झाला.

सुकृत जोशी, श्रीरिता जोशी, वेदिश अत्रे, युक्ता जोशी ,सावनी वाघ, देवेशी चोडणकर हे स्पर्धेतील विजेते ठरले.

चारुदत्त आफळे म्हणाले,  निसर्गाच्या संवर्धनाचा विचार करुन निसर्गाच्या संगोपनाची सूत्रे हाती घ्यायला हवीत. आध्यात्मिक प्रगतीसाठी निसर्ग उपयुक्त आहे. मनाशी संवाद साधण्यासाठी निसर्गाची गरज आहे. गायींचे रक्षण आणि गायीची उपयुक्तता देखील त्यांनी यावेळी सांगितली. गाईंच्या संहारासाठी दुष्ट उभे रहात असतील तर शिवरायांचे पाईक होऊन गाईंचे रक्षण करा, असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading