‘बारसू’ युनेस्कोच्या ‘जागतिक हेरिटेज वारसा स्थळांमध्ये’..ही बाब दुर्लक्षीत करण्याजोगी नाही..! – राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे : बारसू (महाराष्ट्र) येथील या कोकण किनार पट्ट्यात विविध ऐतिहासीक व प्राचीन भूगोलांचा हा मोठा समूह असून भारताच्या ‘पश्चिम घाट’ या कोकण प्रदेशातील बारसू हे “युनेस्कोच्या जागतिक हेरीटेज वारसा केंद्रात” गणले जाते, ही बाब दुर्लक्ष करण्या जोगी नसल्याचे काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी जारी केलेल्या प्रसिध्दी निवेदनात म्हंटले आहे..!
युनेस्को वारसा स्थळ यादीत समाविष्ट महत्वाच्या व पुरातन स्थळा पैकी बारसू ची 900 km rock art ही mohenjodaro समकालीन आहेत. यात युनेस्को च्या कायदेशीर परवानगी खेरीज इथे काही करता येणे, कसे शक्य आहे (?) याची जाणीव करणारा ईशारा देऊन केंद्र व राज्य सरकारने गांभीर्याने या बाबी हाताळाव्यात असेच काँग्रेस चे म्हणणे असल्याचे सांगितले.
यासाठी स्वर्गीय राजीव गांधी यांचे ‘वसुंधरा कोष’ वर केलेले United Nations मधील भाषण, ते पंतप्रधान असताना भारतातर्फे घेतलेली पर्यावरण पुरक भूमिका, व पर्यावरणाचे महत्व विषद करणारे, जगास केलेले आंतरराष्टीय आव्हान’ या भारताने ‘जागतिक पर्यावरण’ विषयी स्वीकारलेल्या धोरणात्मक बाबी, तथ्यपुर्ण व महत्वाच्या आहेत. याचे ऊचीत भान देशातील सत्ताघिशांनी ठेवणे गरजेचे आहे. पूर्वीच्या भारतीय पंतप्रधानांनी अर्थात स्व राजीव गांधीं नी घेतलेल्या या पर्यावरणीय हितैषी भूमिकेचे त्यावेळी अंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे कौतुक झाले होते. त्या जागतिक पर्यावरण हितैषी राष्ट्रीय भूमिकेला’ भारता कडुनच छेद देणारा नकारात्मक पर्यावरणीय निर्णय होऊ नये असेच राष्ट्रीय धोरणात्मक बाब म्हणुन काँग्रेस ला वाटते.
बार्सू येथील पठारात कोकणच्या किनारी पट्ट्यातील ६२ भूगोलांचा हा सर्वात मोठा समूह असुन, माणसाचे आणि वाघांचे मोठे कोरीवकाम आहे अशा अनेक विविध भू आकृती, भू शिल्पाकृती, कातळ शिल्प तयार झाल्याचे पहायला मिळते..!
वाघांवरील पट्टे रेषांच्या मांडणीने बनवलेले असुन आयताकृती आणि त्रिकोणात्मक भु-शिल्पाकृती तयार झाल्याचे समजते. वाघांच्या भौ-मितिक उपचारांच्या विरूद्ध, मानवी आकृतीचे डोके गोल, वक्र कंबर आणि गोलाकार पाय असतात. छाती भौमितिक अमूर्त फॉर्मसह दर्शविली आहे अशा प्रकारच्या भूआकृती तयार झाल्याचे ही निदर्शनास येत असल्याचे काँग्रेसने म्हंटले आहे.
मानवी धडाच्या डाव्या बाजूला मासे, ससा आणि मोर यांच्या आकृत्यांचे कातळ-शिल्पांचे चित्रणरुपी अस्तित्व आहे. विद्वानांनी हडप्पा संस्कृती-हडप्पा आणि मोहेंजो-दारोच्या उत्खनन केलेल्या ठिकाणांवरून नोंदवलेल्या सीलवर चित्रित केलेल्या आकृतिबंधासह या रचनेतील साम्य दर्शवले आहे या सर्व ‘जागतिक प्राचिन ईतिहास व भारताची संस्कृती व ओळख दर्शवणारा आहे’…! याची दखल युनेस्को ने घेतल्याचे स्पष्ट पणे आढळते आहे .. त्यामुळे प्राचिन भारतीय ईतीहासाचा ठेवा जर नष्ट होण्याचे संकट संभाव्य रिफायनरी मुळे होणार असेल तर याचा केंद्र व राज्य सरकारांनी गांभीर्याने विचार करायला हवा असे प्रतिपादन ही काँग्रेस राज्य प्रवक्त्यांनी केले..!
ते पुढे म्हणाले की,
रिफायनरी प्रकल्प समुद्र किनारी करतात कारण त्यातील तेल, घाण द्रव्य, रसायन, औषध, अनैसर्गिक वायू, इ समुद्रात सोडतात.. त्यामुळे ‘पश्चिम किनार पट्टी घाटाचे भागातील कोकण परीसरातील’ समुद्राच्या पण्याचे तापमान वाढू शकते व त्यातील जीव वैविधता, मासे इ. मोट्या प्रमाणावर नष्ट होण्याचा धोका संभवतो.. त्याच बरोबर मोठ्या बेकारीचे संकट ओढावु शकते. कोकण किनार पट्टी भागात मासेमारी हे कोकणातील मोठे रोजगाराचे साधन आहे..त्याचे उच्चाटन होण्याचा धोका संभवू शकतो..
मा श्री माधव गाडगीळ अहवाला नुसार तर पश्चिम घाटाची निसर्ग संपत्ती, जैव – वैविधता, आंबा, केळी, फणस, नारळ, सुपाऱ्या आदींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असुन हे उत्पादनातुन देशात व विदेशात निर्यात होते.. वास्तविक कोकण रेल्वे मुळे कोकण’चा कॅलीफोर्निया होण्याचे भाकीत होऊ लागले मात्र तेल रिफायनरी प्रकल्पांमुळे कोकणातील ही नैसर्गिक संपत्तीच नष्ट होण्याचा धोका येऊ घातलाय काय (?) याच भावनेने स्थानिक नागरीक भयभीत होऊन मोठ्या प्रमाणात विरोध करत आहेत, ही वास्तवता देखील राज्य सरकारने समज़ुन घेतली पाहीजे..
पश्चिम घाट असलेल्या भारताच्या महाराष्ट्रातील कोकण पट्टी तील जैव वैविधता (Biodiversity) टिकवण्या साठी, राज्यास रोजगार व महसुल देणारी मोठी नैसर्गिक संपत्ती आंबा, नारळ, केळी, फणस, काजू, सुपारी इ उत्पादन टिकवण्या साठी ‘या भागात कोणतेही रसायन निगडीत प्रकल्प न करण्याचे पुर्वीच्या सरकारांचे धोरण’ असतांना देखील केंद्र सरकारचा दबाव व अट्टाहास का..? गुजरात ला देखील मोठी समुद्र किनार पट्टी असतांना तसेच युनेस्कोचे जागतिक हेरिटेज स्थाने नसतांना तेथे मोठी रिफायनरी न करतां, महाराष्ट्रातील कोकणचे अपरिमित नैसर्गिक नुकसान, रोजगार – महसुल आदी चे नुकसान करण्याचा धाट का धातला जात आहे…? असा संतप्त सवाल देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी विचारला..!
पर्यवरणाची हानी करणाऱ्या रासायनिक प्रकल्पा ऐवजी, कोकणातील नैसर्गिक संपत्ती व वातावरणाची जपणुक करत तेथे ‘आयटी पार्क’ इ देखील उभारून, मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो.. यावर खरे तर राज्य सरकारने विचार केला पाहीजे व राज्याचे हित जोपासणारे प्रकल्पांनाच मंजुरी दिली पाहीजे असेही काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले..!
(सोबत पृष्ट्यर्थ संदर्भान्कीत माहीती जोडली आहे)…!!
—————————————————————————
https://whc.unesco.org/en/tentativelists/6605/
ही unesco ची official sight आहे.
GEOGLYPHS: रत्नागिरीची प्रागैतिहासिक रॉक आर्ट
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू गावात पेट्रोकेमिकल रिफायनरी बांधल्याने परिसरात सापडलेल्या सुमारे 250 प्रागैतिहासिक भूगोलांचे नुकसान होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे..!
जिओग्लिफ्स हा प्रागैतिहासिक रॉक कलेचा एक प्रकार आहे, जो लॅटराइट पठारांच्या पृष्ठभागावर खडकाच्या पृष्ठभागाचा काही भाग चीरा, उचलणे, कोरीवकाम किंवा अॅब्रेडिंगद्वारे काढून तयार केला जातो. ते रॉक पेंटिंग्स, एचिंग्ज, कप मार्क्स आणि रिंग मार्क्सच्या स्वरूपात असू शकतात.
जिओग्लिफ्सचे क्लस्टर महाराष्ट्र आणि गोव्यात कोकण किनारपट्टीवर पसरलेले आहेत, सुमारे 900 किमी.
रत्नागिरी जिल्ह्यात अशा प्रकारच्या 1,500 हून अधिक कलाकृती आहेत, ज्याला “काटल शिल्प” देखील म्हणतात, 70 साईट्सवर पसरलेल्या आहेत.
वय: कार्बन डेटिंगनुसार, या साइट्स हजारो वर्षांहून जुन्या असल्याचे मानले जाते. ही स्थळे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) द्वारे संरक्षित आहेत.
जिओग्लिफ्समध्ये चित्रित केलेल्या आकृत्यांमध्ये मानव आणि प्राणी जसे की हरीण, हत्ती, वाघ, माकड, रानडुक्कर, गेंडा, हिप्पोपोटॅमस, गुरेढोरे, डुक्कर, ससा आणि माकड यांचा समावेश आहे.!त्यामध्ये कासव आणि मगर यांसारखे सरपटणारे आणि उभयचर प्राणी, शार्क आणि स्टिंग्रेसारखे जलचर आणि मोरासारखे पक्षी यांचाही समावेश आहे.
रत्नागिरीची रॉक आर्ट मेसोलिथिक (मध्यम पाषाण युग) पासून सुरुवातीच्या ऐतिहासिक युगापर्यंत मानवी वसाहतींच्या निरंतर अस्तित्वाचा पुरावा आहे. भौगोलिक लिपी काही विशिष्ट प्रकारच्या जीवजंतूंचे अस्तित्व देखील दर्शवतात जे आज या प्रदेशात अस्तित्वात नाहीत.
या साइट्सवरील प्रतिमा दर्शविते की लोक “उथळ खडकाचे तलाव, नाले आणि जलकुंभ असलेल्या कोरड्या-रखरखीत पठारातील क्षणभंगुर आर्द्र प्रदेशाशी कसे जुळवून घेतात”.
युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत समावेश
एप्रिल 2022 मध्ये, कोकण विभागातील या स्थळांचा UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला.
युनेस्कोच्या यादीत “कोकण भूगोलांचा” उल्लेख आहे. तथापि, इतरत्र, पेट्रोग्लिफ हा शब्द (शब्दशः, “रॉक चिन्ह/वर्ण”) देखील वापरला जातो..!
युनेस्कोच्या तात्पुरत्या जागतिक वारसा यादीत रत्नागिरी जिल्ह्यातील पेट्रोग्लिफसह सात स्थळांचा उल्लेख आहे – उक्षी, जांभारुन, कशेळी, रुंधे तळी, देवीहसोल, बारसू आणि देवाचे गोठणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक – कुडोपी गाव आणि गोव्यातील फणसामळ येथील नऊ स्थळे इ चा समावेश आहे..!! त्यामुळे ही जतन करणे हाच सर्वप्रथम राज्याच्या हिताचा ‘महाराष्ट्र धर्म’ …!!!
