Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

यंत्रणांचा गैरवापर करून बदनाम व नामोहरम करण्याचा प्रयत्न – जयंत पाटील

मुंबई : विरोधी पक्षात जे ठामपणे उभे राहतात आणि सरकारला विरोध करतात त्यांच्याविरोधात सर्व यंत्रणांचा गैरवापर करून त्यांना बदनाम व नामोहरम करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर ईडीचे छापे पडल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले, हसन मुश्रीफ यांच्या घरावर याअगोदरही आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. मात्र त्यामध्ये काहीच सापडले नाही परंतु आता ईडीने धाड टाकली आहे. सत्ताधारी विरोधकांवर यंत्रणांचा गैरवापर करून बदनाम व नामोहरम करण्याचा प्रयत्न करीत आहे.  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading