शहा यांना महापालिकेच्या निवडणुकीसाठी यावे लागते हाच आमच्या शिवसेनेसाठी नैतिक विजय -अंबादास दानवे
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी रात्री मुंबईत दाखल झाले आणि आता ते दोन दिवसांच्या दौऱ्यावर सक्रिय झाले आहेत. ते पहाटे लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. उद्धव ठाकरे सरकार पडल्यानंतर आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाल्यानंतर अमित शहा यांचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे. यावेळी ते भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांची भेट घेऊन बीएमसी निवडणुकीबाबत चर्चा करतील. असे मानले जात आहे
त्यावर अंबादास दानवे म्हणाले अमित शहा यांना महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी यावे लागते. हाच आमच्या शिवसेनेसाठी नैतिक विजय आहे. असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले.
अंबादास दानवे म्हणाले,आमचा मुंबई महापालिकेमधील विजय हा दैदिप्यमान असेल. असा विश्वास विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. शिंदे गटातील आमदार आपण सते वर आल्यामुळे हवेत आहेत. असे विरोधी पक्षातील नेते म्हणत आहे . त्यावरअंबादास दानवे म्हणाले,शिवसेना ही जमिनीवरच असून ते आकाशात आहेत. आम्ही त्यांना चांगले आकाश दाखवू. शिवसेना फक्त निवडणुकीसाठी काम करत नाही. आम्ही जनतेसाठी काम करतो, त्यामुळे आमचा मुंबईत विजय होईल. असे अंबादास दानवे म्हणाले. शिवसेनेच्या दोन्ही गटात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपाबाबत दानवे म्हणाले, एकनाथ शिंदे गटातील नेत्यांची भाषा मस्तीची आहे. त्यांच्याकडे आलेले खोक्यांची ही भाषा आहे.