Sunday, September 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मला अद्याप नोटिस नाही; आज लवासा दिवाळखोरीत आहे – अजित पवार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य काही जणांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. लवासा प्रकरणी सहा आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले,लवासा बाबतीत हाय कोर्टाने केस निकाली काढली होती. मला अजून नोटीस अली नाही.चॅनेलवर बघितले.आज लवासाची काय अवस्था आहे ती बघा. दिवाळखोरीत आली  आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजपने सोपवली असून, सीतारामन या दिनांक १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर तीन दिवस असणार आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले,
बारामती विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून निर्मला सितारामाण यांचं स्वागत करतो. बारामतीच्या विकासाची माहिती करुन घेण्यासाठी पंतप्रधान येऊन गेले. त्यासोबतच अनेकजण येऊन गेलेत. त्यांच्याकडून निर्मला सीतारमण यांना माहिती मिळाली असेल. त्यांनी बारामतीचा विकास पहायला यावे. असं अजित पवार म्हणाले,
निर्मला सितारमण यांनी निवडणूकीची जबाबदारी घेतली आहे मात्र कोणी निवडणुकीची जबाबदारी घेतल्याने काही होत नाही. उद्या मी पण वाराणसीची जबाबदारी घेऊ शकतो. मात्र जबाबदारी घेणाऱ्यांनी विचार करायचा आहे की आपण खरंच काही करु शकतो का?, आपण वेळ वाया घालवत आहोत.अशा शब्दात अजित पवार यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली.
सुप्रीम कोर्टाच्या एका वकीलाने आमिर खान विरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. विनीत जिंदाल असे नाव असलेल्या या वकिलाने लाल सिंह चड्ढा या चित्रपटाबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे हा पिक्चर वादात सापडला आहे. त्यावर लाल सिंग चढ्ढा चित्रपट बघितला नसल्याने मी त्यावर काहीही विधान करणार नाही मात्र आता अनेक लोक पब्लिसीटीसाठी बॉयकॉट करा किंवा अनेक प्रकारच्या चर्चा करतात. त्यावरुन जनता आकर्षित होते आणि चित्रपट बघायला जाते. यांचाही पब्लिसीटी स्टंट असू शकतो.असं स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
एकनाथ शिंदे व फडणवीस यांचे सरकार जास्त काळ टिकणार नाही असे बोलत आहेत .त्यावर अजित पवार म्हणाले, कुणाचंही सरकार आलं तरी 145 मॅजिक फिगर असेल तोपर्यंत सरकार टिकणार. ज्यावेळी 145 ची फिगर गेली त्यावेळी सरकार जाणार अशी घनाघाती टीका अजित पवार यांनी फडणवीस व शिंदे सरकारवर केली.
एकनाथ शिंदेंनीच घेतलेला निर्णय बदलला
प्रभाग रचनेचा निर्णय बदलण्यासाठी राष्ट्रवादीने न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, कारण या सरकारला महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका पुढं ढकलायच्या आहेत. निवडणूकांसाठी त्यांना आता वेळ हवा आहे. एकनाथ शिंदे यांनीच नगरविकास खात्याचे मंत्री असताना त्यांनी नवीन प्रभागरचनेचा प्रस्ताव आणला होता आणि आता मुखमंत्री असताना त्यांनीच निर्णय बदलला.या बाबत एकनाथ शिंदे यांना जाब विचारणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading