‘हिंदुत्व फॉरेव्हर’ म्हणत एकनाथ शिंदेचे ट्विट
मुंबई-उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाइव्ह वरून जनतेशी साधलेल्या संवादानंतर सुमारे अडीच तासांनी एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले असून गेल्या अडिच वर्षात महाविकास आघाडी सरकार मधील घातक पक्षांना फक्त फायदा झाला आणि शिव्सानिक मात्र भरडला गेल्याचे म्हटले आहे . या शिवाय घातक पक्ष मजबूत होत असताना शिवसेनेचे मात्र पद्धतशीर पणे खच्चीकरण होत आहे असेही म्हटले आहे
खरे तर हि भावना अगदी तळागाळातील शिवसैनिकांमध्ये अडीच वर्षात पसरलेली आहे अगदी त्याचाच उल्लेख करत शिंदे यांनी शिवसैनिकांच्या वर्मावर बोट ठेवणारे हे ट्वीट केले आहे . मात्र ते स्वतः शिवसेनेतील आणि सरकारमधील मंत्री आणि गटनेते होते त्यांनी असे म्हणणे राजकीय वर्तुळात कितपत रुचणार आहे हे मात्र पाहावे लागणार आहे.
एकीकडे वर्ष बंगला सोडून मातोश्री वर जाण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी सुरु केली असताना दुसरीकडे त्यांच्या समर्थनासाठी शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या समर्थनाच्या घोषणा देत रस्त्यावर दिसू लागलेला असताना हे ट्वीट करत एकनाथ शिंदे नी शिवसैनिकांना आणखी भावनिक साद घालत ठाकरेंपासून दूर खेचण्याचा तर प्रयत्न केला नाही न ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
एवढेच नव्हे तर शिंदे यांनी पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे आवश्यक आहे म्हणत महारष्ट्र हितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे असे आवाहन ठाकरे यांचे नाव न घेता केले आहे.
३. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
४. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.#HindutvaForever
१. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
२. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. #HindutvaForever