या व्यक्तीने जी जी आंदोलने केली ती फेलं गेली अजित पवार यांची राज ठाकरे याचा वर नाव न घेता टीका
पुणे : काही दिवसापासून मनसेच्या मशिदींवरील भोंग्यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मेपर्यंतचा राज्य सरकारला अल्टीमेट दिला होता, मनसेने भोंग्याविरोधात राज्यभरात आंदोलन केलं. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ज्यांनी भोंग्यासंदर्भात आंदोलन केले, त्याच व्यक्तीने पुणे-मुंबईच्या टोल नाक्याविरोधात काही दिवसापूर्वी आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला गर्दी झाली होती, पण याचं पुढं काय झालं? या व्यक्तीने जी जी आंदोलने केली ती फेलं गेली.अशी टीका उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांच्या वर नाव न घेता केली.
ओबीसी आरक्षणाशिवाय महानगरपालिका निवडणुका द्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिल्या आहेत त्यामुळे ओबीसी समाजामध्ये नाराजी पसरली आहे ओबीसी समाजाचा अजून सुप्रीम कोर्टाकडून निकाल यायचा आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, ओबीसी आरक्षणाबाबत आज न्यायालयाचा निकाल येतोय. कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे पालन करावे लागते. त्याचा अवमान होता कामा नये. याबाबत काम सुरू आहे. एवढ्या मोठ्या ओबीसी समाजाच्या बाबतीत निर्णय घ्यावा लागेल. राज्य निवडणूक आयोग कधी निवडणूक लावते हे पाहव लागेल.असे अजित पवार म्हणाले,
कोरोगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडे यांना क्लीन चीट मिळाल्या अश्या काल बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत .काल शरद पवारांचीही चौकशी झाली. आयोग त्यांच काम करत आहे. भिडे यांना राष्ट्रवादीचा कोणी नेता पाठींबा देत नाही, पाठीशी घालत नाही. जो पाठिबा देत असेल, तो राष्ट्रवादीचा नाही, अशा शब्दात अजित पवारांनी भिडे यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.