fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

सरकारला जागे करण्यासाठी विद्यार्थ्यांवर जागरण गोंधळ आंदोलनाची वेळ – अभाविप

पुणे: विद्यापीठाची स्वायत्तता धोक्यात आणलेल्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात व झोपलेल्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी अभाविप पुणे महानगराच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दिवसा जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.

कोवीड च्या पार्श्वभूमीवर पुन्हा नव्याने सुरू झालेल्या शिक्षण क्षेत्रात आधीच विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच, सरकारने गुणवत्तापूर्ण शिक्षणावरती परिणाम होऊन विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात जाऊ शकते असा निर्णय घेतला. राज्य सरकारने विद्यापीठ कायद्या मध्ये केलेल्या बदलामुळे विद्यापीठाची स्वायत्तता धोक्यात आणली आहे. यामुळे भविष्यात शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेपाचा प्रयत्न केला जाईल. राज्य शासनाच्या या भ्रष्ट निर्णयाच्या विरोधात अभाविप ने सातत्याने निदर्शने, आंदोलने केली. परंतु, यावर काही एक उत्तर विद्यार्थ्यांना मिळाले नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading