Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRA

‘जनशक्ती’च्या आंदोलनाचा एन.पी. कन्स्ट्रक्शनला दणका

करमाळा:मुदतीत काम न झाल्याने कोर्टी ते आवाटी रखडलेल्या रस्त्यासाठी जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे यांनी धरणे आंदोलन केले. परिणामी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय ताब्यात घेतले. आणि वेळेत व मुदतीत काम न झाल्यामुळे संबंधित विभागाने एन.पी. कन्स्ट्रक्शन कंपनीला दणका दिला असून
प्रति दिवस ८.५ लाखा प्रमाणे पाच महिन्यांसाठी १२ कोटी ७५ लाख रु..दंड केला असून यापुढे देखील काम पुर्ण होईपर्यंत प्रतिदवस उदंड लागू होणार असल्याचे सांगण्यात आले.

कोर्टि ते आवाटी रस्त्यासाठी जनशक्ती संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. दिलेल्या इशाऱ्यानुसार धरणे आंदोलन न करता जनशक्ती ने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय ताब्यात घेतले.
इकडे अतुल खुपसे कार्यालयात आल्याचे लक्षात येताच एकच धावपळ उडाली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी आणि संबंधित कंपनीचे अधिकारी यांनी एकत्रित येऊन सोबत चर्चा करण्याचे ठरले.

चर्चेअंती वेळेत काम न झाल्याने संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याचे पत्र अधिकारी ने दिले तर रस्ता सुरू असल्याने दोन्हीचे प्रचंड लोट उडत आहेत.
यासाठी रोज पाणी मारण्याचे १२ टँकर देण्याचे ठरले आणि काम त्वरित चालू करणार असल्याचे आश्वासन अधिकारी व ठेकेदाराने दिले.

यावेळी युवा जिल्हा प्रमुख बाबासाहेब चव्हाण, अतुल राऊत,,रामराजे डोलारे, सागर शिंदे, अक्षय देवडकर, शरद एकाड, काका कोळी, बालाजी तरंगे, जोतिराम तरंगे, अक्षय शिंदे, अक्षय देवडकर, दीपाली डिरे, कोमल खाटमोडे, दीपाली जगताप, मारुती खटके, निखिल सरडे, वैभव मस्के, अशोक भोई, राजाभाऊ मल्लव, सुवर्णा विटकरी, कांता गुंजाळ, कोमल चौगुले, नीलाबाई देवकर, पप्पू मारकड, रणजित बिरंगळ, अजीज सय्यद, साहेबराव विटकर, अचू देशमुख, अंकुश भोसले, शहाजी देशमुख, जुबेर निंबाळकर, राणा महाराज वाघमारे, सीना देवकर, नवनाथ ढेरे, बापू कोकणे, हनुमंत कणतोडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading