पानिपत युद्धानंतर मराठयांची खरी ताकद जगाला समजली इतिहास अभ्यासकांचे मत
पुणे : पानिपत युद्धावेळी मराठ्यांनी वेळोवेळी आखलेली रणनिती, युद्धाचा भौगोलिक भाग, युध्दात वापरलेली शस्त्र आणि युध्दशास्त्र, शत्रू सैन्यावर केलेली चाल, त्याकाळात घडलेले राजकारण, इंग्रजांची व इतर संस्थांनांची भूमिका याचा उहापोह करताना इतिहास संशोधन मंडळात पानितपताचा इतिहास उलगडला. पानिपतच्या या मोठया युद्धानंतर मराठयांची खरी ताकद जगाला समजली, असे मत इतिहासतज्ञ व अभ्यासकांनी खुल्या चर्चासत्रात मांडले.
इतिहास संस्कृती कट्टा व डॉ.चंद्रशेखर गणेश पेशवे यांच्यावतीने महाराष्ट्र धर्माचा परिपाक पानिपतचे तिसरे युद्ध याविषयावरील खुल्या चर्चासत्राचे आयोजन इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी घन:श्याम ढाणे, शिवराम कार्लेकर, उमेश जोशी, विद्याचरण पुरंदरे चर्चासत्रात सहभागी झाले होते. कार्यक्रमाला अॅड. राजेंद्र ठाकूरदेसाई, संदीप परांजपे, विशाल खुळे, महेश फळसणकर, तुकाराम चिंचणीकर, डॉ.गिरीश मांडके, डॉ.सचिन जोशी, सचिन दाते, माधव देशपांडे आदी उपस्थित होते. पानिपत युध्दाबद्लचे अनेक प्रश्न उपस्थितांनी विचारले.
