ओबीसी आरक्षणासाठी वंजारी समाज आक्रमक
पुणे : ओबीसी आरक्षणासाठी वंजारी समाज आता आक्रमक झाल्याच पाहायला मिळत आहे. जय भगवान महासंघाचा आज पुण्यामध्ये भव्य मेळावा भरवण्यात आला. यावेळी ओबीसी आरक्षणासाठी भगवान गड ते मुंबई ओबीसी आरक्षण संघर्ष पदयात्रा काढणार असल्याचे ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी जाहीर केले.
कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. केंद्र सरकार असो वा राज्य सरकार त्यांनी ओबीसींच्या हिताचा निर्णय घ्यावा. एकमेकांवर आरोप न करता ओबीसी हिताचा निर्णय घ्यावा, अस आवाहनही त्यांनी सरकारला यावेळी केले. भगवान महासंघातर्फे भरवण्यात आलेल्या या मेळाव्यात वंजारी समाजाने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.