ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेऊ नये- बाळासाहेब सानप
ओबीसी समाज 17 डिसेंबरला रस्त्यावर उतरणार
पुणे: राज्यसरकारने एम्पिरिकल डेटा तात्काळ सुपूर्त करण्यात यावे केंद्र सरकारने राज्य सरकार वर एम्पिरिकल डेटा दिला नाही असा आरोप करत आहे. त्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होऊ घातलेल्या निवडणुका तात्काळ थांबविण्यात यावे जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये ओबीसींचे आरक्षण पूर्ववत होत नाही .तोपर्यंत महाराष्ट्र मध्ये कोणत्या प्रकारचे निवडणुका घेण्यात येऊ नये अन्यथा ओबीसी समाजाच्या 17 डिसेंबरला रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करणार आहे असा इशारा पुण्यातील पत्रकार परिषदेत व्ही.जे.एन .टी.च्या मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत दिला. या पत्रकार परिषदेत महासचिव बालाजी शिंदे, उपाध्यक्ष राजू साळुंके, विनायक वाजपेयी उपस्थित होते.
