खडकवासला काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी विजय दिवस उत्साहात साजरा
पुणे:अन्नदात्या शेतकऱ्याच्या विरोधात तीन काळे कृषी कायदे मोदी सरकारने बनवले होते त्या कायद्याविरोधात प्रचंड असा संघर्ष करून प्रसंगी 600 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे बलिदान देऊन उन पावसाची व थंडीची तमा न करता केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले .काल मोदी सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला अन्नदात्या शेतकऱ्याच्या हा विजय आहे .काँग्रेस पक्षाने आजचा दिवस शेतकरी विजय दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले, त्यानुसार आज खडकवासला विधानसभा काँग्रेस कमिटी मधील सर्व कार्यकर्त्यांनी खडकवासला गावांमधील शेतकऱ्यांना पेढे वाटून हा आनंद साजरा केला.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्रीरंग चव्हाण पाटील, खडकवासला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पै राहुल मते पाटील, पुणे जिल्हा महिला काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सौ अर्चना शहा, हवेली तालुका किसान काँग्रेस चे अध्यक्ष विजय लगड, पुणे जिल्हा किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष शंकर दांगट, हवेली तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रघुनाथ यादव, खडकवासला काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय अभंग, राहुल गांधी खडकवासला विचार मंचचे अध्यक्ष सुहास धावडे, माजी सरपंच प्रशांत नानगुडे, ज्येष्ठ कार्यकर्ते एस के नाना जावळकर, दिलीप मते, गणेश निंबाळकर, गजानन मते ,शंकर सर ,शंकरराव रायकर अनेक कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.