आमचं काम आम्ही प्रामाणिकपणे केल आहे -शरद पवार
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपालांना जी 12 आमदारांच्या नावाची यादी दिली आहे त्यात राजू शेट्टींचं नाव आहे. राजू शेट्टी यांचा सहकार आणि शेती क्षेत्रातील काम पाहता त्यांचे नाव आम्ही सुचवलं आहे. या संदर्भातला अंतिम निर्णय राज्यपालांकडून येणे बाकी आहे. राष्ट्रवादीने आपला शब्द पाळला आहे, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिले.
पवार पुण्यात एका कार्यक्रमात आले असता .पत्रकारांनी त्याच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी माहिती दिली. पवार म्हणाले, आम्ही दिलेला शब्द पाळला असून राज्यपाल काय करतात याकडे आमचे लक्ष आहे.राजू शेट्टी नाराज असतील माहिती नाही,आम्ही जे नाव राज्यपाल यांना दिली आहे त्याच शेती व सहकारी क्षेत्रात काम केलं आहे त्यानं घ्यावं अस सागितले आहे अजून त्यावर निर्णय झाला नाही, मी दिलेला शब्द पाळला आहे,राजू शेट्टी यांनी काय करावं हा त्याचा निर्णय आहे.
मंदिरे उघडण्यावरून भरपूर दिवस राजकारण होत आहे भाजप व मनसेने मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन केले पण राज्य सरकार अजूनही मंदिरे उघडले नाहीत. त्यावर त्यांनी भाष्य केले .केंद्र सरकारने राज्य सरकारला काही नियमावली दिली आहे.आणखी काही दिवस खबरदारी घ्यायची गरज आहे असा निर्दिश आहे .मुख्यमंत्री ती काळजी घेत आहेत.अन्य घटक काही दुसरे मत असेल तर लोकशाही आहे,केंद्र सरकारच्या विचारांची लोक आहेत त्यानी तारतम्य ठेवण्याची गरज आहे. असे बोलून शरद पवार यांनी केंद्राची बाजू घेतली. दिल्ली लाठीचार्ज झाला खूप दिवस दिल्लीत शेतकरी बसले आहेत .त्यांची दखल केंद्र सरकारने घ्यायला हवी होती .पण दुर्दैव आहे. अनेक राज्यात अस होत आहे. पण अन्य राज्यात हा विषय आहे. असे बोलून शरद पवार यांनी केंद्र सरकारला टोला लगावला.
