श्री शिवाजी मंडळ व शांताई संस्था यांच्या वतीने गरजू महिलांना धान्य किट वाटप
पुणे – श्री शिवाजी मंडळ व शांताई संस्था यांचे संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ यांच्या स्मृती दिनानिमित्त 200(दोनशे) विधवा,परितक्त्या, अपंग व गोरगरीब महिलांना धान्य किट वाटप करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण वाघमारे यांचे हस्ते हे वाटप करण्यात आले.
राष्ट्रमाता जिजाऊ यांचे स्मृति दिनानिमित्त यावेळी शांताई संस्थेमध्ये शिवण क्लासचे उदघाटन करून शिवणवर्ग सुरू करण्यात आला.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते रमेश कांबळे, वसंत बराटे, सुहास राजगुरू, इकबाल सय्यद , राजाराम देवकर, प्रकाश बरगे, दिनकर मोहिते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण भाऊ वाघमारे होते. प्रस्तावना बापू (महेंद्र) कांबळे यांनी केली तर सूत्रसंचालन रश्मी कांबळे यांनी केले. आभार निलेश नेहरे व प्रकाश सोहोळ यांनी मानले.