देशात २४ तासात तब्बल ४० हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले

नवी दिल्ली, दि. २० – भारतात गेल्या २४ तासात आतापर्यंतची सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढ झाली आहे. देशात काल दिवसभरात ४० हजार ४२५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६८१ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या विक्रमी वाढीनंतर भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा ११ लाख १८ हजार ४३ वर पोहोचला आहे. यामध्ये ३ लाख ९० हजार ४५९ सक्रिय रुग्ण आहेत. याबाबतची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर महाराष्ट्रात काल ९ हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
