Sunday, March 29, 2026
BusinessLatest News

एअरबीएनबी ने महाराष्ट्राची भारताचे ‘इव्हेंट टुरिझम’ केंद्र म्हणून होत असलेली वाढ केली अधोरेखित

पुणे एअरबीएनबीचा अलीकडेच प्रकाशित झालेला अहवाल अनलॉकिंग महाराष्ट्र इव्हेंट इकॉनॉमीः पॉवरिंग टुरिझम अँड लोकल कम्युनिटीज‘ मध्ये अधोरेखित करण्यात आले की प्रवासाला वाढत्या प्रमाणात अनुभवांमुळे चालना मिळत असल्याने महोत्सवक्रीडा कार्यक्रम आणि सांस्कृतिक उत्सव महाराष्ट्रभर पर्यटनाची मागणी आणि पर्यटकांच्या खर्चाला वेग देत आहेतत्यामुळे महाराष्ट्र भारतातील कार्यक्रमकेंद्री प्रवासाचे प्रमुख केंद्र बनले आहे.

राज्यभरात मोठ्या प्रमाणावरील उपक्रमांमुळे पर्यटकांमध्ये मोठी वाढ होऊ लागली आहे२०२३ मधील विश्वचषक सामन्यांदरम्यानमहाराष्ट्रात राहिलेल्या पाहुण्यांमध्ये वार्षिक स्तरावर ५० टक्के वाढ झालीत्याचबरोबर सामन्याच्या तारखांदरम्यान पर्यटकांच्या चेकइनमध्ये ७५ टक्के  वाढ झालीतसेच जानेवारी २०२५ मध्ये मुंबईतील कोल्डप्लेच्या कार्यक्रमादरम्यान बुकिंगमध्ये १०० टक्के  वाढ झाली आणि मैफिलीच्या तारखांदरम्यान पाहुण्यांच्या संख्येत १७० टक्के  वाढ झालीपर्यटकांनी या क्षणांचे ट्रिप्समध्ये रूपांतर केले.  हा कल पुढे लोलापलूझा इंडिया २०२६ सारख्या उत्सवांमध्ये प्रतिबिंबित झालाजिथे मुंबईतील बुकिंगमध्ये वार्षिक स्तरावर ५० पेक्षा जास्त वाढ झाली आहेजानेवारीमधील सर्व बुकिंगपैकी ८० टक्यांपेक्षा जास्त बुकिंग महोत्सवाच्या आठवड्यात होते.

अलीकडील सर्वेक्षणानुसारतरुण भारतीय कार्यक्रमावर आधारित प्रवासावर अधिकाधिक खर्च करत आहेतत्यातील प्रत्येक ट्रिपमध्ये सामान्यतः ५१,०००  रुपये खर्च करतात आणि दहापैकी सहा प्रवासी त्यांच्या मासिक उत्पन्नाच्या २१४० टक्के  संगीतावर आधारित प्रवासावर खर्च करतातकॉन्सर्टच्या तिकिटावर खर्च केलेल्या प्रत्येक एक हजार रूपयांमागे अतिरिक्त १५०० – २००० रूपये पर्यटन अर्थव्यवस्थेतनिवासवाहतूक आणि स्थानिक व्यवसायांमध्ये विभाजित होतात.

एअरबीएनबीवरील खर्चाने २०२५ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत ८३. कोटी डॉलर्सपेक्षा जास्त योगदान दिले आणि विविध क्षेत्रांमध्ये ,२२,००० रोजगार निर्माण केले.

एअरबीएनबीचे भारत आणि आग्नेय आशियाचे राष्ट्रीय प्रमुख अमनप्रीत बजाज म्हणाले, “कार्यक्रम वाढत्या प्रमाणात लोकांच्या प्रवास करण्याच्या पद्धतीला आकार देत आहेत आणि हे कसे दीर्घकाळ टिकते आणि अधिक स्थानिक आर्थिक घडामोडींमध्ये रूपांतरित होते हे महाराष्ट्र अनुभवतो आहे. “राज्य मोठ्या प्रमाणावरील कार्यक्रमांना आकर्षित करत असल्याने पर्यटकांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आणि अधिकाधिक समुदायांना पर्यटनाच्या वाढी सहभागी होण्यासाठी  त्याचा लाभ घेण्यासाठी पुरेशी निवास व्यवस्था शक्य करणे महत्त्वाचे ठरेल.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading