Friday, April 10, 2026
BusinessLatest NewsPUNE

जेईई मेन 2026 मध्ये आकाश इन्स्टिट्यूट पुण्याची शानदार कामगिरी: 16 विद्यार्थ्यांचे यश; 99.99 पर्सेंटाइलसह दीक्षांत शर्माचा टॉप स्कोर


पुणे : Aakash Educational Services Limited (AESL) अंतर्गत पुणे विभागातील विद्यार्थ्यांनी जेईई मेन 2026 (सेशन 1) मध्ये पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची ठोस साक्ष दिली आहे. National Testing Agency (NTA) यांनी 16 फेब्रुवारी रोजी जाहीर केलेल्या निकालानुसार, आकाश इन्स्टिट्यूट पुणे येथील 16 विद्यार्थ्यांनी 99 पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवत भक्कम कामगिरी नोंदवली.

या यशात दीक्षांत शर्मा याने 99.99 पर्सेंटाइल मिळवत टॉप स्कोरर म्हणून अव्वल स्थान पटकावले. त्याच्यानंतर तेजस कोरे (99.78 पर्सेंटाइल), पियुष यादव (99.75), शिवप्रसाद लक्ष्मण देवकर (99.71) आणि प्रत्युष आलोक कुमार तिवारी (99.54) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

याशिवाय कैवल्य विजय घरगे (99.44), पार्थ निकम (99.43), आर्या दिवेकर (99.35), निखिल बेवाल आणि सोहम निशिकांत पाटील (दोघेही 99.31), दिव्या दीपक कटारिया (99.29) तसेच उत्कर्ष प्रदीप निबे (99.20) यांनीही उत्कृष्ट यश संपादन केले.

तसेच ओम देशमुख (99.15), हसिनी चिक्काला (99.08), वरद महाडिक (99.05) आणि पर्ल सोमाणी (99.04) यांच्या कामगिरीमुळे पुणे विभागाची एकूणच भक्कम आणि प्रभावी उपस्थिती राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या यशावर प्रतिक्रिया देताना डॉ. एच. आर. राव, चीफ ऑफ अकॅडेमिक्स आणि बिझनेस हेड, Aakash Educational Services Limited म्हणाले,
“पुण्यातील आमच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे निकाल त्यांच्या कठोर परिश्रमांचे आणि आकाशच्या मजबूत शैक्षणिक इकोसिस्टमचे स्पष्ट उदाहरण आहेत. त्यांच्या मेहनतीचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आम्ही मनःपूर्वक शुभेच्छा देतो.”

यशस्वी विद्यार्थ्यांनी आत्मशिस्त, सातत्यपूर्ण सराव, कठोर प्रशिक्षण, योग्य वेळी मिळालेले मार्गदर्शन आणि नियमित मूल्यांकन हे यशाचे प्रमुख घटक असल्याचे नमूद केले. संरचित अभ्यासक्रम, अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नियमित मॉक टेस्ट्समुळे कमतरता वेळेत ओळखून कामगिरीत सातत्याने सुधारणा करता आल्याचेही त्यांनी सांगितले.

जेईई मेन ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीत सुधारणा करण्याची संधी मिळते. या परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना National Institutes of Technology (NITs), Indian Institutes of Information Technology (IIITs) तसेच सरकारी अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो. जेईई मेनमध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी पुढे Indian Institutes of Technology (IITs) मध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा देऊ शकतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading