Thursday, April 9, 2026
BusinessLatest NewsNATIONAL

आयआयएम रायपूर आणि सिंगापूर यांच्यात शैक्षणिक व संशोधन सहकार्याची नवी दिशा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रायपूर (आयआयएम रायपूर), एनआयटी रायपूर आणि आयआयटी भिलाई यांनी संयुक्तपणे सिंगापूर प्रजासत्ताकाच्या कॉन्सुलेट-जनरलचे कॉन्सुल (पॉलिटिकल) श्री. जेरोम वाँग आणि सुश्री एरिका यांच्यासोबत उच्चस्तरीय संवाद साधला. या बैठकीत शैक्षणिक व संशोधन सहकार्याच्या नव्या शक्यता तपासण्यात आल्या. सिंगापूर-भारत राजनैतिक संबंधांच्या ६०व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली असून शिक्षण, नवोन्मेष व कौशल्यविकासाच्या क्षेत्रात सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याचा उद्देश होता.

या बैठकीला आयआयएम रायपूरचे संचालक (प्रभारी) प्रा. संजीव प्रशार, आयआयटी भिलाईचे संचालक प्रा. राजीव प्रकाश, एनआयटी रायपूरचे संचालक डॉ. एन.व्ही. रमण राव, जीएम-सीएसटीडीसी श्री. अजीत भाटपाहरी, आयआयएम रायपूरचे प्रा. सुमीत गुप्ता आणि एनआयटी रायपूरचे डॉ. अनुज शुक्ला आदी वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते.

चर्चेत सिंगापूर सरकार व छत्तीसगड राज्य सरकार यांच्यातील सहकार्याच्या विविध संधींचा आढावा घेण्यात आला. वाढत्या औद्योगिक पायाभूत सुविधांमुळे छत्तीसगडला सेमीकंडक्टर विकास व संबंधित सहकार्यांसाठी संभाव्य केंद्र म्हणून अधोरेखित करण्यात आले. सिंगापूरमधील विद्यापीठांसोबत संयुक्त अभ्यासक्रम सुरू करणे तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी विनिमय कार्यक्रम अधिक विस्तारित करण्याच्या शक्यतांचाही विचार करण्यात आला.

सिंगापूरचे प्रतिनिधींनी भारतीय संस्था व सिंगापूरमधील विद्यापीठांमध्ये सहयोगी संशोधन, विद्यार्थी विनिमय आणि दुहेरी पदवी कार्यक्रम राबविण्यासाठी दुवा साधण्याची तयारी व्यक्त केली. या सहकार्यांना गती देण्यासाठी डेटा सेंटर्स आणि डिजिटल पायाभूत सुविधांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

छत्तीसगड सरकार आणि सिंगापूर सरकारच्या प्रतिनिधींनी छत्तीसगड व सिंगापूरमधील विद्यापीठे, उद्योग क्षेत्र आणि धोरणात्मक संस्थांमध्ये सहकार्याच्या शक्यता तपासल्या.

सर्व नेत्यांनी भारतीय व सिंगापूरी संस्थांनी एकत्रितपणे संशोधन, नवोन्मेष आणि शाश्वत विकासासाठी योगदान देण्याचे समान दृष्टीकोन अधोरेखित केले. भारतातील नवोन्मेषकेंद्रित शैक्षणिक संस्था आणि सिंगापूरची कौशल्याधारित अध्यापन व संशोधनातील प्रावीण्य यांचा संगम घडवून जागतिक स्तरावरील कार्यक्रम निर्माण करणे व विद्यार्थ्यांना भविष्याची तयारी करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

ही बैठक आयआयएम रायपूर येथे झालेल्या सत्कार समारंभाने आणि चर्चिलेल्या संयुक्त उपक्रमांसाठी कृती आराखडा तयार करण्याच्या निर्धाराने सकारात्मक व भविष्याभिमुख वातावरणात संपन्न झाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading