‘एचपी पॉवर लॅब – विकसित भारतासाठी कल्पना’ मोहीम यशस्वी
पुणे : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल ) द्वारे आयोजित देशव्यापी “एचपी पॉवर लॅब – आयडियाज फॉर अ डेव्हलप्ड इंडिया” मोहिमेत भारतभरातील 1,29,288 विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला. या अनोख्या उपक्रमाचा उद्देश नावीन्यपूर्णतेला चालना देणे आणि भारताच्या विकासाच्या दृष्टीकोनात योगदान देणे हा होता. या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना ऊर्जा, समता आणि समावेशकता , ग्रामीण भारताची ऊर्जा, हरित ऊर्जा, शाश्वतता आणि तांत्रिक नवकल्पना या महत्त्वाच्या विषयांवर आपल्या कल्पना मांडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते . पाच महिन्यांच्या तपशीलवार मूल्यमापन प्रक्रियेनंतर अंतिम फेरीसाठी 151 विद्यार्थ्यांच्या 48 संघांना पुण्यात आमंत्रित करण्यात आले होते. या संघांना एचपीसीएल च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठित परीक्षक मंडळा समोर त्यांच्या कल्पना मांडण्याची संधी मिळाली. ग्रँड फिनालेमध्ये, 15 संघांनी अंतिम फेरी गाठली आणि आयआयटी , एनआयटी आणि आयआयएम सारख्या प्रमुख संस्थांसह देशभरातील 7,000 हून अधिक शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पना सादर केल्या.
एचपीसीएलचे संचालक-रिफायनरी श्री एस. भरथन आणि संचालक-मानव संसाधन श्री के. एस. शेट्टी, इतर ज्येष्ठ मान्यवर आणि उद्योगातील नेतृत्व, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते.
एनआयटी दुर्गापूरच्या संघाने “पॉवरपॉड्स: सोलर एनर्जी सोल्यूशनसह किफायतशीर इंधनाचा विस्तार ” या कल्पनेसाठी अखिल भारतीय विजेतेपद पटकावले. आयआयटी मद्रासने “एचपीसीएल च्या रिफायनिंग, प्रोसेसिंग आणि डिस्ट्रिब्युशन सिस्टीम्समधील ऊर्जा कार्यक्षमतेसाठी पुढील पिढीचे उपाय” या कल्पनेसाठी दुसरे स्थान मिळवले. दिल्ली विद्यापीठाच्या दौलत राम महाविद्यालयाला “ऊर्जा समता आणि समावेशन” या कल्पनेसाठी तिसरे स्थान मिळाले.
भारताच्या विकासाच्या प्रवासात योगदान देण्यासाठी हे अभियान नागरिक, संस्था आणि संस्थांना सक्रिय सहभागासाठी प्रेरित करते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवकल्पना आणि कल्पनांचे वास्तवीकरण ही महत्त्वाची भूमिका बजावते आणि
एचपीसीएल ची ही मोहीम उद्योगातील नेतृत्वांना तरुण प्रतिभेशी जोडण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.
एचपीसीएलचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि भविष्यातील नेतृत्व तयार करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने केलेला एक अनोखा प्रयत्न आहे. परिवर्तनात्मक बदल घडवून आणण्याची आणि भारताला नाविन्यपूर्ण आणि ऊर्जा उपायांमध्ये जागतिक नेतृत्व बनवण्याची क्षमता असलेल्या उद्योगाने या प्रयत्नाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले आहे.
