Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

विधानसभा निवडणुकीत निवडणुकीत महिला गेम चेंजर ठरणार – भाजप नेते प्रवीण दरेकर


पुणे : महायुती सरकार म्हणून आम्ही मतदार यांच्या समोर जाताना अडीच वर्षातील विकासाची शिदोरी घेऊन जात आहे. लाडकी बहिण योजना माध्यमातून दीड हजार रुपये महिलेच्या बँक खात्यात जाणार आहे ती रक्कम वाढवणे आश्वासन सरकारने दिले आहे. आघाडी मधील नेते ही योजना बंद करण्यासाठी धडपड करत असताना काही नेते हो योजना स्वतःच्या कार्यालयातून राबवत दुटप्पी भूमिका घेत आहे. नौटंकी करण्याचे काम आघाडी करत असून आम्ही ताकदीने ही योजना पुढे नेणार आहे कारण हा सामाजिक विषय आहे. महिलांचे संसार यावर चालणार नसले तरी त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ही रक्कम उपयोगी पडत आहे. या निवडणुकीत महिला गेम चेंजर ठरणार आहे असे मत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी प्रवक्ते संदीप खर्डेकर, अमोल कवीटकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.
दरेकर म्हणाले, विधानसभा निवडणुकीत महविकास आघाडी फसव्या घोषणा देण्यात आघाडीवर आहे. फेक नारेटिव्ह माध्यमातून अवास्तव खोटे मुखवटे लावले आहे ते जनता यंदा निवडणुकीत उतरवल्या शिवाय राहणार नाही. कर्जमाफी , सातबारा कोरा करण्याच्या, वीजबिल माफी अशा घोषणा उध्दव ठाकरे यांनी सत्तेत असताना दिल्या पण त्यांची पूर्तता केली नाही. हिरवी शाल पांघरून ते हिंदुत्ववादी भूमिका घेत आहे. लोकसभा निवडणुकीत आघाडीकडून जे संभ्रमित करण्यात आले ,त्याचा वचपा यंदाच्या निवडणुकीत जनता घेईल. लखपती दीदी, एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, शेतकरी यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून सन्मान निधी मिळत आहे. शेतकरी कर्जमाफी निर्णय देखील झाला आहे. शेतकरी कृषी पंप यांना वीज माफी करण्यात आली आहे. उध्दव ठाकरे यांच्या काळात सिंचन प्रकल्पांना कोणती मंजुरी मिळू शकली नाही पण देवेंद्र फडणवीस यांनी १०६ सिंचन प्रकल्प मंजुरी दिली. रोजगार बाबत आघाडी सरकार असताना राज्य गुंतवणुकीस मागे गेले होते पण युती काळात पुन्हा आपण गुंतवणूक मध्ये अग्रेसर राहिलो आहे. सरकार आल्यावर पुढील १०० दिवसातील व्हिजन आमचे तयार आहे. जीवनावश्यक वस्तू दर स्थिर ठेवणे प्रयत्न केले जातील. तरुणांना रोजगार हमी देण्यात येत आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देणे प्रयत्न युती सरकार करत आहे.
पुण्यात मेट्रो जाळे पसरत आहे तीन विस्तारित मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे. रिंग रोड माध्यमातून वाहतूक कोंडी सोडवली जात आहे. राज्यातील जनतेला विश्वास देणे काम आमच्या माध्यमातून होत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आघाडी नेते महिला सन्मान गोष्टी करून त्यांना अर्वाच्च भाषेत त्यांचे नेते बोलणे करत आहे. वैफल्यग्रस्त ते झाल्याने त्यांची अशी वक्तव्य होत आहे. खासदार संजय राऊत यांनी नेहमी प्रमाणे गरळ ओकत आहे आता ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधणे गोष्टी ते करतात. पण याबाबत आम्हीच सकारात्मक निर्णय घेतला. आघाडी नेत्यांना केवळ विशिष्ट लोकांचे लांगूलचालन पाहिजे आहे. केवळ हातात संविधान घेऊन नौटंकी करण्याचे काम काँग्रेस नेते राहुल गांधी करत आहे.त्यांनी संविधान मेळावा घेण्यापेक्षा अंतःकरणात संविधान हवे याकडे लक्ष्य द्यावे. भाजपने नेहमी संविधान सन्मान करून त्याचे रक्षण केले. लोक आता सजग झाले असून ते आता महायुती सोबत राहतील. राज्याचे उज्वल भविष्यासाठी युती काम करत असून आघाडी सरकार हे स्थगिती सरकार होते हे लोकांनी पाहीले आहे. नवाब मलिक यांचा प्रचार भाजपचे कार्यकर्ते करणार नाही हे आम्ही ठरवलेले आहे त्यामुळे मतदारसंघात युतीच्या उमेदवाराचे काम करण्यात येईल असे दरेकर यांनी स्पष्ट केले.
जेष्ठ नेते शरद पवार खोट्या गोष्टी सातत्याने मांडत आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली उध्दव ठाकरे यांचे सरकार असताना जीएसटी बैठकीत व्यापारी अडचणी मांडू शकले नाही. अजित पवार केवळ दोन बैठकीस गेले नाही परंतु इतर सर्व जीएसटी बैठकींना ते हजर राहिले आहे. कोणता तरी नरेटिव्ह सेट करण्यासाठी ते प्रयत्नशील आहे. बारामती मध्ये पुढील पिढीचे नेतृत्व पाहिजे असे शरद पवार सांगून योगेंद्र पवार यांचे नेतृत्व पुढील तीस वर्षाकरिता लागत आहे बाकीच्या युवा पिढीने केवळ त्यांचे झेंडे वाहण्याचे काम करावयाचे का असा टोला देखील यावेळी दरेकर यांनी लगावला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading