fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

माणसाची प्रगती आणि पर्यावरणाचा संहार यात समतोल हवा

पुणे : आपण आणि पर्यावरण एक आहोत. दोन्हीमध्ये समतोल राखला गेला नाही तर पर्यावरणाचा संहार होईल. माणूस जी प्रगती करतोय ती आवश्यकच आहे पण माणसाची प्रगती आणि पर्यावरणाचा संहार याच्यामध्ये समतोल राखायला हवा. पृथ्वीच नसेल तर त्या प्रगतीचा उपयोग नाही. पृथ्वी सुंदर आहे त्याचे सौंदर्य पुढच्या पिढीलाही दिसायला हवे, असे मत प्रसिद्ध निसर्ग छायाचित्रकार श्रीधर देशपांडे यांनी व्यक्त केले.

पर्यावरणाविषयी जनजागृतीचा प्रयत्न करणारी फोटोथाॅन २०२३ छायाचित्रण स्पर्धा इकोफॉक्स आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळातर्फे घेण्यात आली आहे. स्पर्धेचा फ्लॅग ऑफ म्हात्रे पुलाजवळील इंद्रधनुष्य सभागृह येथे झाला. यावेळी श्रीधर देशपांडे, सुधीर हसमनीस, राजेंद्र महामुनी, विश्वनाथ जोशी, भरत डोरले, गिरीश पोटफोडे यावेळी उपस्थित होते.

फोटो स्टोरी, नेचर, मोबाईल छायाचित्र आदी श्रेणीत पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक देण्यात येईल.  यंदा पुण्यासह मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजी नगर या शहरांत देखील स्पर्धा होत आहेत. सर्व ठिकाणी मिळून एकूण सुमारे ३ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. यापूर्वी विविध सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी फोटोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असे माहिती आयोजक परेश पिंपळे यांनी दिली.

श्रीधर देशपांडे म्हणाले, निसर्गाचे छायाचित्रण करताना आपल्या मनापासून करा. निसर्गाची काळजी करणारे खूप जण आहेत. छायाचित्रणाच्या माध्यमातून भावनिक पद्धतीने संदेश गेला तर नक्की फायदा होईल. फोटोचा अर्थ सुंदर नाही तर खरा असावा, त्यात वस्तुस्थिती असावी. सुधीर हसमनीस, राजेंद्र महामुनी यांनी मनोगत व्यक्त केले. गिरीश पोटफोडे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading