स्वदेशी जागरण मंचच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
पुणे : भारतातील आर्थिक प्रश्नांवर काम करणाऱ्या स्वदेशी जागरण मंचच्या राष्ट्रीय परिषदेच्या दोन दिवसीय बैठकीचे उद्घाटन शनिवारी पुण्यातील कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत झाले.
बैठकीबाबत माहिती देताना स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय सहसंयोजक अजय पत्की म्हणाले की, स्वदेशी जागरण मंचची राष्ट्रीय परिषद, ज्यामध्ये मंचाचे अखिल भारतीय पदाधिकारी, सर्व राज्ये व प्रदेशांचे पदाधिकारी आणि देशातील नामवंत विचारवंत सहभागी झाले आहेत. ही बैठक दोन दिवस चालणार आहे. देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी दोनशेहून अधिक विचारवंत या बैठकीत जमले आहेत.
सभेचे उद्घाटन स्वदेशी जागरण मंचचे अखिल भारतीय संयोजक आर.सुंदरम यांच्या हस्ते भारत मातापूजनाने झाले. अखिल भारतीय संयोजक काश्मिरी लाल, अखिल भारतीय सहसंयोजक डॉ.अश्विनी महाजन, डॉ.धनपत अग्रवाल, अरुण ओझा यावेळी उपस्थित होते. हुतात्मा बाबू गेनू, महात्मा गांधी, दत्तोपंत ठेंगडी.यांच्या प्रतिमेला यावेळी पुष्प अर्पण करण्यात आले.
परिषदेच्या उद्घाटन सत्रात अजय पत्की यांनी स्वदेशी जागरण मंचच्या भारतभरातील पदाधिकाऱ्यांसमोर भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. कर्वे यांचे स्त्रीशिक्षण, विधवा पुनर्विवाह आदि विषयांवर त्यांनी प्रकाश टाकण्यात आला
मंचाचे राष्ट्रीय संयोजक आर सुंदरम यांनी उद्घाटन सत्रात आपल्या भाषणात सांगितले की, जगाच्या विकासात पर्यावरण महत्त्वाची भूमिका बजावेल. भारताच्या किरकोळ व्यवसायावर ई-कॉमर्सचा प्रभाव अधोरेखित करणे, जेथे किरकोळ व्यवसायात ई-कॉमर्सवर नियम बनवून भारतातील लहान किरकोळ व्यापाऱ्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे.
मंचचे अखिल भारतीय संघटक काश्मिरी लाल यांनी स्वदेशी जागरण मंचने वर्षभरातील स्वावलंबी भारत अभियान आणि इतर मुद्द्यांवर केलेल्या कामाचा संपूर्ण देशभरातील आढावा घेतला.
उद्घाटन सत्राला देशभरातील स्वदेशी जागरण मंचच्या पदाधिकाऱ्यांसह पुणे शहरातील प्रमुख मान्यवरांचीही उपस्थिती होती. उद्घाटन सत्रात पाहुण्यांच्या हस्ते तयार केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. स्मरणिकेचे प्रास्ताविक संपादक प्रा.शैलजा सांगळे यांनी केले.
बैठकीच्या पहिल्या दिवशी मंचचे अखिल भारतीय संयोजक डॉ. धनपत अग्रवाल यांनी भारत 2047 या संकल्पनेवर एक प्रस्ताव मांडला, त्यावर आज विचारमंथन सत्र झाले, या प्रस्तावावर चर्चा होऊन प्रस्ताव सभेच्या दुस-या दिवशी पारित होईल.
मंचचे राष्ट्रीय सहसंयोजक डॉ. अश्विनी महाजन यांनी स्वदेशी जागरण मंचच्या वतीने डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी मजबूत करण्याबाबतचे निवेदन प्रसिद्ध केले, त्यानुसार भारतातील बड्या बँकांना विदेशी रोख्यांच्या पेमेंटमध्ये रुपयाचा वापर करण्याबाबत चर्चा झाली. अनिल शर्मा यांनी भारतात सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेबाबत मंचाने जारी केलेल्या निवेदनावरही चर्चा केली.
अखिल भारतीय सहसंघटक सतीश कुमार यांनी आत्मनिर्भर भारत अभियानासंदर्भात देशभरात सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. या मोहिमेअंतर्गत, देशात आतापर्यंत सुरू केलेल्या ४०० हून अधिक जिल्हा रोजगार निर्मिती केंद्रांच्या बळकटीकरण आणि यशस्वी कार्याद्वारे युवकांमध्ये उद्योजकतेचे प्रबोधन आणि दिशा देण्यासाठी कार्य करण्याच्या कृती आराखड्यावर चर्चा करण्यात आली.
दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत भारत 2047 या विषयावर सखोल विचारमंथन होणार आहे. स्वदेशी जागरण मंच व्यतिरिक्त आर्थिक समूहाच्या इतर संघटना, लघु उद्योग भारतीय, किसान संघ, भारतीय मजदूर संघ, सहकार भारती, अखिल भारतीय ग्राहक पंचायत या संस्थांचे प्रतिनधी सहभागी झाले आहेत.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पार्टी, हिंदू जागरण मंच यांच्यासह २० हून अधिक संघटनांचे प्रमुख अधिकारी ऑनलाइन चर्चेत सहभागी होऊन या विषयावर विचारमंथन करतील. या परिषदेला आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि प्रतिनिधींचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक मिलिंद देशपांडे, प्रशांत देशपांडे, मुकुल वैद्य, रसिका रहाटेकर यांनी स्वागत केले.
