बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे – संभाजी ब्रिगेड
पुणे : आपल्या देशात आजपर्यंत 17 वेळेस जनगणना झाली. स्वातंत्र्याच्या अगोदर 8 वेळेस सन 1831 साली जात निहाय जनगणना झाली. तसेच स्वातंत्र्याच्या नंतर 7 वेळेस जनगणना झाली. महाराष्ट्र’सह देशात ओबीसींची अवस्था अत्यंत वाईट आहे. ओबीसींचे सगळे नेते वेगवेगळ्या पक्षाची दलाली करण्यात आणि नेत्यांचा आदेश सर्वोच्च मानण्यात धन्यता मानतात. उलट ओबीसी आरक्षण रद्द होण्याच्या मार्गावर आहे. असे असून सुद्धा महाराष्ट्रासह देशात ओबीसी संघटित नाही. झोपेचे सोंग घेतले असल्यामुळे असंघटित ओबीसी आरक्षणावर सतत अन्याय होत आहे. म्हणून बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे… असे संभाजी ब्रिगेड चे म्हणणे आहे.
देशात कुत्र्या-मांजराची, मुक्या जणावरांची जनगणना होते, मात्र ओबीसींची जातनिहाय जनगणना होत नाही. सर्वपक्षीय नेत्यांनीच ओबीसी आरक्षणाचा खून केला. त्यामुळे आम्ही मेल्यानंतर तरी आमच्या मुलांना ओबीसी आरक्षणाचा संपूर्ण लाभ होणार आहे की नाही हे सांगा…? सगळ्या पक्षांनी ओबीसींचा फक्त वापरा आणि हस्तांतरित करा हे धंदे बंद केले पाहिजेत. इंम्पिरिकल डेटा हे OBC चे रक्त आहे, राष्ट्रीय संपत्ती असून संपूर्ण डेटा राज्य सरकारला देऊन रद्द केलेले ओबीसी आरक्षण परत ओबीसींना मिळाले पाहिजे… व ‘महाराष्ट्रामध्ये ओबीसींची जातनिहाय राष्ट्रीय जनगणना झाली पाहिजे… असे मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.