Thursday, August 27, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

केवळ लेखनावर पोट भरणे अशक्य : प्रणव सखदेव

पुणे : तरुणाईने लेखनाकडे जरूर वळावेपण फक्त लेखनाने पोट भरणार नाहीहे लक्षात घेऊन साहित्य क्षेत्रातील इतर नव माध्यमांचाही विचार करावालेखनाकडे आवड म्हणून पहावे असे मत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा लेखक प्रणव सखदेव यांनी व्यक्त केले. लेखकाची पुस्तके ही त्याची एकप्रकारची गुंतवणूकच असते त्यामुळे लेखकाने सातत्यपूर्ण लेखन केल्यास यश नक्की मिळतेअसेही त्यांनी नमूद केले.

नुक्कड साहित्य संमेलनाच्या आजच्या समारोप सत्रात सखदेव यांच्याशी विवेक साहित्य मंचच्या संयोजक डॉ. अर्चना कुडतरकर आणि अभय नवाथे यांनी संवाद साधला. लेखन निर्मितीची प्रक्रियालेखन साहित्यावरील संस्कारसाहित्याविषयी तरुणाईची आवड-निवड या संदर्भातील प्रश्नांना सखदेव यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली.

मन मारत काम करायचे की आवडते ते काम करत इतर वाटाही चोखाळायच्या यावर विचार करून तरुणाईने लेखनाकडे वळण्याचा निर्णय घ्यावा असे सांगून सखदेव म्हणालेआवडगरजांचा प्राधान्यक्रम आणि कुटुंबाला विश्वासात घेणे हे या निवड प्रक्रियेत महत्त्वाचे ठरते. लेखनाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणालेकथाबीज सुचणे व त्याचे साहित्यकृतीत रुपांतर होणे हा मोठा प्रवास असतो. वास्तव हे अनेकरेषीय असल्यामुळे लेखन करताना कथेच्या अलीकडच्यापलीकडच्याआजूबाजूच्या गोष्टींचा शोध घ्यावा लागतो. वास्तव कवेत घेण्यासाठी हा प्रयत्न आवश्यक असतो.

लिखाणावरील संपादन प्रक्रिया अत्यावश्यकच आहेकारण प्रत्येकाचा साहित्यकृतीकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. त्रयस्थाच्या भूमिकेतून बघताना संपादकाचा विचारदृष्टीकोनपार्श्वभूमी वेगळी असल्याने लेखकाला आपल्या लिखाणात बदल करावा लागू शकतो. लेखन प्रक्रियेत लेखकाचा शब्द अंतिम ही संकल्पना चुकीची आहेअसे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. विषय निवडशिर्षकपात्ररचनावातावरणकाळनिर्मितीअुनुवाद प्रक्रिया या विषयीही त्यांनी मते नोंदविली.

उद्घाटन समारंभानंतर आयोजित सत्रांमध्ये ‘कोरीव लेणी‘ या परिसंवादात जी.एं.च कथालेखन या विषयावर डॉ. संजीव कुलकर्णी तर जी.एं.च पत्रलेखन या विषयावर महेश आफळे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. आनंद काटीकर अध्यक्षस्थानी होते. ‘नवकथेचे शिल्पकार गंगाधर गाडगीळ‘ या परिसंवादात डॉ. निर्मोही फडके यांनी कथालेखन तर डॉ. रुपाली शिंदे यांनी कादंबरी विषयांवर मते मांडली. ‘कथा शांतारामांच्याविषय वैविध्याचा‘ या सत्रात डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी कथालेखन तर डॉ. सुजाता शेणई यांनी ललित बंध आणि समीक्षा या विषयांवर अभ्यासपूर्ण मतप्रदर्शन केले. दोन्ही सत्रांचे अध्यक्षस्थान डॉ. नीलिमा गुंडी यांनी भूषविले.

नुक्कड कथा अभिवाचनात अभय नवाथेनेहा लिमयेईशा महल्लेउमेश पटवर्धनश्रीया बर्वे यांचा सहभाग होता. ‘कवितासादरीकरण आणि बरंच काही‘ या सत्रांतर्गत कवितेतील सामाजिकता या विषयावर रमेश वाकनीसकवितेतलं विषयवैविध्य या विषयावर एल.बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कवी प्रवीण दवणे अध्यक्षस्थानी होते. त्यानंतर नवोदित कवींचे सादरीकरण झाले. अध्यक्षस्थानी काव्य-शिल्प संस्थेचे अध्यक्ष मिलिंद जोशी होते. ‘माज्या जल्माची चित्तरकथा‘ याविषयी दिपाली दातार यांनी मुक्तचिंतन केले तर मुक्ता आशामंजू गौतम यांनी दीर्घांकाचे सादरीकरण केले. दिग्दर्शन योगेश सोमण यांचे तर दिग्दर्शन सहाय्य प्रसाद खडके यांचे होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading