fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

प्रसाद लाड यांना महाराष्ट्रात फिरु न देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

पुणे :हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. रायगडावर शिवरायांचं बालपण गेलं आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली’, असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलंय.
त्यावरुन राज्यभर संताप व्यक्त होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लाड यांना महाराष्ट्रात न फिरु देण्याचा इशारा दिलाय.
भाजप नेत्यांकडून गेल्या एक महिन्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणे, महाराजांचा चुकीचं इतिहास दाखवणे, त्यांचा एकेरी उलेख करणे अशी विधाने केली जात आहेत. त्यावरुन आज पुण्यात राष्ट्रवादीने निषेध नोंदवला.
प्रसाद लाड यांना लाज वाटली पाहिजे, तुम्ही तर महाराष्ट्रद्रोही आहात, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading