Thursday, August 27, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

शेवटी सावरकरांचाच विजय होणार-सात्यकी सावरकर


पुणे:आज पुण्यातील सारसबाग येथील सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर हिंदू महासंघाचे आनंद दवे आणि स्वा.सावरकर यांच्या कुटुंबातील सदस्य सात्यकी सावरकर यांनी स्वा.सावरकर यांच्या पुतळ्यावर गुलाब जलाने अभिषेक केला. यावेळी सामुदायिक सावरकर गीत देखील पठण केले.
त्यावेळी सात्यकी सावरकर म्हणाले, यांनी राहुल गांधी यांची भारत जोडो देशातील अनेक भागातून गेली आहे. मात्र त्यावेळी राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारे विधान केले नाही. पण महाराष्ट्रामध्येच आल्यावर त्यांनी सावरकर यांच्याबदल केलेल विधान हे जाणीवपूर्वक केल्याचे स्पष्टपणे दिसते. तसेच, राहुल गांधी यांनी पहिल्यांदा सावरकर यांच्याबद्दल विधान केले होते. त्यावेळी रणजित सावरकर यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. या गोष्टीला थोडा वेळ लागतो; मात्र जे खरे आहे, त्याचाच विजय होतो. वेळ लागू द्या; आज जे झाकोळून ठेवले आहे, ते पण राहु द्या, ते कधी तरी बाहेर पडणार असून .शेवटी सावरकरांचाच विजय होणार. असल्याचे सात्यकी म्हणाले.
राजकीय बंदिवानाला ज्या ज्या सुविधा असतात त्या त्या मला मिळाव्यात म्हणून त्यांनी अवेदनं केली. त्यांनी वेळोवेळी अवेदनं केली. नंतर त्यांनी सुटकेसाठी अवेदनं केली. पण त्यात केवळ माझी सुटका करा असं म्हटलं नाही. माझ्याबरोबर इतर जी क्रांतीकारक अंदमानात डांबली गेली आहेत, त्यांचीही सुटका करा. गदर चळवळीतील असू देत, बंगाल चळवळीतील असू देत या सर्वांची सुटका करा अशी विनंती सावरकरांनी केली होती, असं त्यांनी सांगितलं.
सावरकरांकडे बॅरिस्टरीची पदवी नव्हती. त्यांना रत्नागिरी सोडून बाहेर जाण्यास परवानगी नव्हती. अशा परिस्थितीत माणसाने जगण्यासाठी काय करावे? असा सवाल करतानाच अशा बंदिवानाची जबाबदारी ही शासनाची असते. ब्रिटिशांची असते. तसा अॅक्ट 1928 साली आला होता. या कायद्यानुसारच सावरकरांना 1929 साली निर्वाह भत्ता सुरू झाला. तेही महिना 60 रुपये, असं त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading