राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला तोटाच होईल – डॉ. भागवत कराड
पुणे:राहुल गांधी यांची आख्या देशभर भारत जोडो यात्रा मोठ्या उत्साहात सुरू त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.या भारत जोडो याने काँग्रेसला फायदा तर होणारच नाही उलट झाला तर तोटाच होईल. असे मत पुण्यात पत्रकारांशी बोलताना केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केले.
रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द करून ती अवसायनात (लिक्विडेशन) काढण्याच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशाविरोधात (आरबीआय) रुपी संघर्ष समितीकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याचे आदेश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी दिले आहेत.रुपी बँकेचे विलीनीकरण सारस्वत बँकेत व्हावेत म्हणून आम्ही प्रयत्न केला. पण पाच लाखाचे डिपॉझिट 700 कोटवर गेल्यानंतर सारस्वत बँकेने नकार दिला मग कॉसमॉस बँक समोर आली होती. आरबीआयने लायसन्स रद्द केलं. सारकरकडे त्या विरोधात अपील केलेलं होतं. आम्ही जेंव्हा ते तपासलं तेंव्हा न्यायप्रविष्ट प्रकरण होतं. त्यामुळं आरबीआयचा निर्णय कायम ठेवला.
असे भागवत कराड म्हणाले.
भागवत कराड म्हणाले,बँक वाचवण्यासाठी मी स्वत: मंञी म्हणून खूप प्रयत्न केले पण सुप्रीम कोर्टानेच बँकेची अपील फेटाळून आरबीआई चा निर्णय कायम ठेवल्याने आम्ही हतबल ठरलो… तरीही ही बँक दिवाळखोरीत निघाल्याने 5 लाखापर्यंतच्या ठेवी असलेल्या 98 टक्के ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत.
