fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

उद्धव व आदित्य ठाकरे यांना मातोश्रीमध्ये राहुनच माणसांची दु:ख कळतात – चंद्रकांत पाटील


पुणे:राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. यामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.त्यांच्या या दौऱ्यावर विरोधकांनी टोलेबाजी केली आहे. “महात्मा गांधींसारखे नेते निर्माण झाले याचं कारण की ते देश फिरले, सर्वसामान्य माणसांचं मन समजून घेतलं, हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना उशिरा कळलं. यांना बराच काळ असं वाटलं की मातोश्रीमध्ये राहुनच माणसांची दु:ख कळतात. मात्र, आता त्यांना साक्षात्कार झाला आहे. ते आता फिल्डवर फिरत आहेत ही चांगली गोष्ट आहे. मात्र प्रत्यक्ष फिल्डवर असताना काही गोष्टींची मागणी करायची असते. ही मागणी करताना आपली सत्ता असताना ती गोष्ट आपण केली होती का हे देखील लक्षात ठेवायचे असते असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
आहे”.असा खोचक टोला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले,ज्या गोष्टी आपण सत्तेत असताना केल्या नाहीत याची आठवण असायला पाहिजे. विरोधी पक्षाची दखल सत्ताधारींनी घेतली पाहिजे. त्यामुळे ती घेतली जाईल. लोकशाहीमध्ये ईच्छा व्यक्त केली तर त्यात काही चुकीचं नाही आहे. असेही पाटील यांनी म्हटले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading