fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

या सरकारला पालकमंत्री नेमण्याच्या मुहूर्त सापडत नाही -दिलीप वळसे पाटील

पुणे : राज्यात शिंदे व फडणवीस सरकार स्थापन १०० दिवस झाले तरी. अजून प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री या सरकारने नेमला नाही. त्यामुळे या सरकारवर विरोधक सारखे टीका करत आहेत. त्यावर त्यांना कशाची भिती वाटते कळत नाही.
सरकार स्थापन होऊन १०० दिवस झाले तरी खातेवाटप होत नाही. पालकमंत्री नेमले जात नाहीत.या गोष्टीला मुहूर्त सापडत नाहीये. असे राज्याचे माजी गूह मंत्री पाटील दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
आज पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षी होणाऱ्या साखरेची बैठक आज पार पडली. त्यानंतर पाटील यांनी पत्रकारांची संवाद साधला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिल्लीत नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली आहे. त्यानंतर शुक्रवारी पक्षाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे.
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना नव्या कार्यकारिणी स्थान देण्यात आलं आहे, मात्र मनी लॉड्रिंग प्रकरणात गजाआड असलेल्या नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्य प्रवक्ते पदावरून दूर केले आहे. त्यावर दिलीप वळसे पाटील म्हणाले,मलिक यांच्या मुलीला प्रवक्ता पद दिलेलं आहे. असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.
जिल्ह्याला अजून पालकमंत्री नेमला नाही. त्यामुळे जिल्ह्याचे नुकसान होत आहे त्यावर दिलीप वळसे पाटील म्हणाले, जो निधी जिल्हा नियोजन साठी येतो तो लॅप्स होईल. नागरिकांच नुकसान होईल. असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading