युवकांनी चौकटीबाहेर जाऊन विचार करावा – एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले
पुणे : समृद्ध आणि विकसित भारतासाठी युवकांनी चौकटीबाहेर जाऊन विचार करण्याची गरज असल्याचे मत एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी) आणि बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गोखले बोलत होते. पद्मश्री मुरलीकांत पेटकर, प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित, संघटनेचे अध्यक्ष अरुण निम्हण, सचिव सुहास पटवर्धन, डॉ. राजश्री गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती.
गोखले म्हणाले, ‘‘आपल्या देशाला वैभवशाली इतिहास आणि परंपरा आहेत. त्याचा तरुणांनी अभ्यास केला पाहिजे. भारत हा सर्वाधिक युवकांची सं‘या असणारा तरुण देश आहे. देशासमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी युवकांनी प्रसंगी जोखीम पत्करून काम करणे आवश्यक आहे.’’
पॅरालॉम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून देणार्या मुरलीधर पेटकर यांनी विद्यार्थ्यांना आपले अनुभव सांगितले.