बाळासाहेबांचं ऐकणार की शरद पवारांचं? – राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुंबई : राज्यातील मशिदीवरचे भोंगे उतरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला देलेली मुदत आज संपत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी एक पत्रक काढून कार्यकर्त्यांना भोंग्यांविरोधातील आंदोलन कायदेशीर मार्गाने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. “आपल्याला दंगल घडवायची नाही. पण जिथे अनधिकृतपणे भोंग्यांवरून अजान, बांग सुरू असेल तिथे तिथे हनुमान चालिसा लावा” अशा सूचना असे राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. तसेच “बाळासाहेब ठाकरे यांनी भोंगे उतरवा असे सांगितले होते. तर बाळासाहेबांचं ऐकणार की शरद पवारांचं” असा सवाल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे.
राज ठाकरे यांनी पत्रकात लिहिले आहे की, “राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतो की ‘हिंदूहृद्य सम्राट’ बाळासाहेब ठाकरे यांनी कित्तेक वर्षांपूर्वी मशिदीवरचे भोंगे उतरलेच पाहिजे, हे सांगितले होते. त्यांचे ऐकणार आहात की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या धर्मनिरपेक्षवादी शरद पवारांचे ऐकणार आहात? याचा फैसला एकदाचा महाराष्ट्राच्या जनते समोर होवूनच जाऊ दे”
सर्वांना आवाहन pic.twitter.com/SNgxd2GMTA
— Raj Thackeray (@RajThackeray) May 3, 2022