fbpx
Friday, April 26, 2024
MAHARASHTRA

दोन दिवसाचे अधिवेशन परवडणारे नाही – नाना पटोले

मुंबई – दोन दिवसाचे अधिवेशन लोकशाहीला परवडणार नाही अशा शब्दातच विधानसभा अध्याक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारचे आज कान टोचले. इतर राज्यातही ८ दिवसांचे अधिवेशन होत आहे. अशावेळी अवघ्या दोन दिवसातल्या अधिवेशनाने जनतेच्या प्रश्नाला न्याय मिळणार नाही, अशा शब्दात नाना पटोले यांनी अधिवेशनाच्या कालावधीवर टिप्पणी केली. विधानसभेच्या कामकाजाला पहिल्या दिवसाची सुरूवात झाल्यानंतर रवि राणा यांच्या फलकबाजीनंतर त्यांनी हे मत सभागृहात बोलताना मांडले.

राज्यातले प्रश्न अनेक आहेत. आमदारांचे अधिकार आणि जनतेचे प्रश्न सभागृहातच मांडू शकतो. म्हणून सरकारला विनंती विरोधी पक्ष आणि सरकार यांनी बसून नियमावली करा. सोशल डिस्टन्सिंग घेऊन नियमावली तयार करावी. दोन दिवसांचा वेळ अपुरा आहे. पुढचे अधिवेशन नियमित अधिवेशन होईल ही कारवाई केली पाहिजे असेही नाना पटोले म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading