fbpx
Friday, April 26, 2024
MAHARASHTRA

कोविडसंदर्भात राज्यात १ लाख ९७ हजार गुन्हे दाखल

मुंबई दि. २१ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ९७ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३१ हजार ३३२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

अत्यावश्यक सेवेसाठी ६ लाख १९ हजार ७९४ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते २० जुलै या कालावधीत

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३१५ (८८१ व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०७ हजार ८४२

राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८०५ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४६

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ८८

(मुंबईतील ४७ पोलीस व ४ अधिकारी असे एकूण ५१, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३, नाशिक शहर १, एटीएस १, मुंबई रेल्वे ४, ठाणे शहर ७, ठाणे ग्रामीण २ पोलीस, १ अधिकारी, जळगाव ग्रामीण १,पालघर २, रायगड २, जालना एसआरपीएफ १ अधिकारी, जालना ग्रामीण १, अमरावती शहर १, उस्मानाबाद-१, नवी मुंबई एसआरपीएफ १, औरंगाबाद शहर १, नवी मुंबई १)

कोरोना बाधित पोलीस – १९९ पोलीस अधिकारी व १४१० पोलीस कर्मचारी

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading