कोरोना – राज्यात शनिवारी ८ हजार ३४८ नवीन रुग्ण; १४४ मृत्यू
आज ५३०६ रुग्ण बरे होऊन घरी; आतापर्यंत १५ लाखांहून अधिक चाचण्या
मुंबई, दि.१८ : राज्यात आज ५३०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ६५ हजार ६६३ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८३४८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २३ हजार ३७७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली.