fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRA

पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष संवर्धनाची गरज – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

पंढरपूर, दि. १ : प्रत्येक झाड ऑक्सिजन निर्मितीचा कारखाना असते. म्हणून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्ष संवर्धनाची गरज असल्याचे प्रतिपादन पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. दरम्यान, वृक्ष लागवड मोहिमेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह आवारात वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तुळशी वृंदावन येथे वृक्षारोपण केले. यावेळी सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वन संरक्षक दिनेशकुमार त्यागी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, वृक्ष हे जल व मृद संधारणाचे महत्वाचे साधन आहेत. शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि सकस अन्न वृक्ष लागवडीतूनच मिळणार आहे. प्रदूषण नियंत्रणात वृक्षांचे महत्व जाणून शेतकरी, विद्यार्थी, नागरिक आणि शासकीय यंत्रणांनी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी.

पालकमंत्री भरणे म्हणाले, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड करून वृक्षांचे संवर्धन करणे महत्वाचे आहे. समाजातील सर्व घटकांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हावे. यावेळी त्यांनी वन विभागाने साकारलेल्या तुळशी वृंदावनाची पाहणी करून कामाचे कौतुक केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading