fbpx
Friday, April 26, 2024
MAHARASHTRA

‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत १४५ विमानांनी तब्बल २२ हजार २५१ प्रवासी मुंबईत दाखल

मुंबई, दि. २७ : ‘वंदेभारत’ अभियानातून परदेशात अडकलेल्या नागरिकांना मुंबईत उतरवून घेण्याची व त्यांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनामार्फत पार पाडली जात असून आतापर्यंत १४५ विमानांनी तब्बल २२ हजार २५१ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये मुंबईच्या प्रवाशांची संख्या ८०७०, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ७६८६ आणि इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ६४९५ इतकी आहे.

१ जुलै २०२० पर्यंत आणखी २६ विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे. ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका,  म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हियतनाम, इटली, स्विडन, इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्टइंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व अफ्रिका, फ्रान्स नैरोबी, न्युयार्क, जॉर्जिया आणि कामेरून अशा विविध देशातून हे प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत.

बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचे काम जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे.

‘वंदेभारत’ अभियानातील कामकाज हे जिल्हाधिकारी मुंबई उपनगर, बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट), महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रा. लि. यांच्या समन्वयाने केले जात आहे.

‘वंदेभारत’ अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading