Sunday, September 20, 2026
Latest NewsPUNE

शिरूर लोकसभेसाठी ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात

पुणे : राज्यातील चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या लढती आता स्पष्ट झाल्या आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या ३५ उमेदवारांपैकी ३ अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्याने शिरूर लोकसभेसाठी ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

शिरूर लोकसभा मतारसंघांत ३२ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असेल तरी प्रमूख लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यातव रंगणार आहे.

अंतिम करण्यात आलेल्या यादीनुसार उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांच्या उपस्थितीत निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.

यावेळी निवडणूक निरीक्षक कुमार सौरभ राज, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे आदी उपस्थित होते. चिन्ह वाटपानंतर श्मोरे यांनी उमेदवारांना निवडणूक नियमांची माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उमेदवारांना ९५ लाख खर्च करण्याची मर्यादा आहे. उमेदवारांकडून खर्च मर्यादेचे उल्लंघन होता कामा नये. नामनिर्देशन पत्र दाखल केल्यापासून खर्च गणना केली जाईल. उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. वाहने, सभा, रॅली, मिरवणूकीसाठी पूर्व परवानगी आवश्यक आहे.

प्रचार कालवधीमध्ये केवळ रुपये १० हजारापर्यंतचा खर्च रोखीने करता येईल, १० हजारांवरील खर्च धनादेशाद्वारे करता येईल, निवडणूक यंत्रणेमार्फत भरारी पथके स्थिर सर्वक्षण पथके तसेच व्हिडीओ संनियंत्रण पथकाद्वारे नियंत्रण ठेवण्यात येईल. शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण २ हजार ५०९ मतदान केंद्र आहेत. उमेदवारांनी प्रत्येक मतदान केंद्रावर दोन मतदान प्रतिनिधी नियुक्त करावेत, अशा सूचना मोरे यांनी केल्या.

दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटील यांचा जनसंपर्क, सत्ता किंवा पद नसतानाही जनतेची कामे करण्याची तत्परता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल झालेली विराट सभा आणि महायुतीला असलेले पोषक वातावरण यामुळे शिरूर मध्ये डॉ. कोल्हे यांच्यापेक्षा आढळराव पाटील यांचे पारडे जड राहिलं असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading