fbpx

Kolhapur : कालीचरण महाराजांनी केले नथुराम गोडसेचे समर्थन

कोल्हापूर : जेवढे नथुराम गोडसे वाचाल तेवढेल त्याचे भक्त व्हाल, आणि महात्मा गांधी यांचे विरोधक व्हाल. त्यामुळे नथुराम गोडसे यांनी जे केले ते योग्यच केले असं वादग्रस्त वक्तव्य  कालीचरण महाराज यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या यावक्तव्यामुळे खळबल उडाली आहे. कालीचरण महाराज हे हे सातत्याने कोणते ना कोणते वादग्रस्त वक्तव्य करत असतात. त्यांच्या अनेक वक्तव्यामुळे वाद निर्माण झाले आहेत. आजही कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी, नथुराम गोडसे आणि राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई ही योग्यच असल्याचे सांगत नवा वाद निर्माण केला आहे.

कालीचरण महाराज हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत येत असतात. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकदा वादही निर्माण झाले आहेत. त्यामुळे आताही नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कालीचरण महाराज यांनी कोल्हापुरात कोल्हापूरत बोलताना सांगितले की, नथुराम गोडसे यांनी जे केल आहे ते योग्यच केले आहे. म्हणजेच त्यांनी केलेली महात्मा गांधी यांच्या हत्येचे त्यांनी समर्थन केले आहे.

यावेळी ते म्हणाले की, जेवढे नथुराम गोडसे वाचाल तेवढे त्याचे भक्त व्हाल, तर महात्मा गांधींचे विरोधक व्हाल असंही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे आहे. जे हिंदू हिताची गोष्ट करतात ते यांच्यासाठी शत्रू आहेत असा टोलाही त्यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे. त्यामुळे राहुल गांधी हिंदूवाद्यांची निंदा करतात मात्र हिंदू आता शेळपट राहिला नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले . तसेच समाजात होणाऱ्या ज्या दंगली आहेत. त्या दंगली मुसलमानांकडूनच घडवल्या जात आहेत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: