मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांवर प्रश्नांचा भडीमार करत निशाणा साधला
पुणे : पुण्याच्या पावसावरुननिर्माण झालेल्या परिस्थितीवरुन आता माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात ट्विटर वॉर बघायला मिळत आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवारांवर प्रश्नांचा भडीमार करत निशाणा साधला आहे. बांधलेले उड्डाणपूल का पाडावे लागले?, सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा का उडाला? अशा प्रकारचे प्रश्न विचारत मुरलीधर मोहोळांनी शहरातील रखडलेल्या कामांवरुन त्यांना जाब विचारला आहे.पुण्यातील पावसानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं आहे, अशी टीका अजित पवारांनी ट्वीट करत भाजपवर केली होती. त्यावर मुरलीधर मोहोळांनी प्रश्न उपस्थित करत प्रत्युत्तर दिलं आहे.
बांधलेले उड्डाणपूल का पाडावे लागले?, आंबिल ओढा दुर्घटनेतील बळींना जबाबदार कोण?, PMPML का खिळखिळी झाली?, सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा का उडाला?, मेट्रो दहा वर्षें कागदावर कोणी ठेवली?, कचऱ्याची समस्या का झाली?, BRT बळींचं पाप कोणाचं? असे शहरातील विविध बाबींवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहे.