Saturday, September 12, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ताकदीने दसरा मेळावा होणार – उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई

पुणे: दसरा मेळावा हा शिंदे गट का शिवसेना घेणार याचा वाद अजून सुरू आहे. त्यावर मुंबईत पाच तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा होणार आहे. न्यायालयामध्ये शिवसेना ठाकरे गट गेलेला आहे. त्यामुळे दसरा मेळावा ही बाब न्यायप्रविष्ट झालेली आहे.आम्ही कायद्याच, नियमांच पालन करणारे कार्यकर्ते आहोत.आम्ही दोन्ही जागेवर परवानगी मागितलेली आहे. प्रशासन आणि न्यायालय जिथे परवानगी देईल.त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ताकदीने दसरा मेळावा होणार, असे वक्तव्य राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई पुण्यात पत्रकार परिषदेत केले.

आज पुण्यात उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांची शंभूराजे देसाई यांनीबैठक घेतली. त्यानंतर देसाई यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

शंभूराजे देसाई म्हणाले की, शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू गर्जना यात्रा राज्यभरात सुरू आहे. सातारा,सोलापूर, अहमदनगर आणि पुणे या चार जिल्ह्यांची माझ्यावर जबाबदारी होती. त्या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या यात्रेतून मागील अडीच महिन्यामध्ये जनतेसाठी केलेल काम सांगितले. या यात्रेतून जनतेच्या भावना लक्षात घेता. शिवसेना आणि भाजपची नैसर्गिक युती राहिली पाहिजे होती. मात्र लोकांना अडीच वर्षात बोलण्याची संधी मिळत नव्हती.आमच्या भूमिकेमुळे लोकांना बोलण्याची संधी मिळाली आहे. हे लवकर होण्याची गरज होती. अशा तरुण वर्गाकडून प्रतिक्रिया आल्या असल्याच शंभूराजे देसाई यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरे करण्यापेक्षा प्रशासकीय कामात लक्ष द्यावे असा सल्ला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. त्यावर शंभूराजे देसाई म्हणाले की, प्रशासकीय काम कुठेही थांबलेले नाही. मंत्रिमंडळाच्या नियमित बैठका होत आहे. मंत्री देखील नियमितपणे काम करीत आहे. माननीय मुख्यमंत्री हे कुठे ही मौजमजा करण्यास फिरत नाही. राज्यातील जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी ते फिरत आहेत. राज्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्या करीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली येथे दोन दिवसापासून आहेत. राज्यातील प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले.

शंभूराजे देसाई म्हणाले, मागील मुख्यमंत्री अडीच वर्षात मंत्रालयात आले नाहीत. त्यावेळी पवार साहेबांनी, मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे होते. तुम्ही मंत्रालयात जावा,तुम्ही लोकांना भेटा, तुम्ही लोकांचे प्रश्न समजून घ्या. त्यावेळी शरद पवार यांनी हाच सल्ला किंवा आदेश दिला असता.तर ते अधिक बर झालं असत, अशा शब्दात शंभूराजे देसाई यांनी शरद पवार यांना टोला लगावला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading