fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

पुण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. यात सूर्यदत्त कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९२.४१ टक्के, तर सूर्यदत्त पब्लिक स्कुलचा निकाल ९३.७९ टक्के लागला आहे. सायन्स, कला, वाणिज्य, एमसीव्हीसी व बायफोकल अशा सर्वच शाखेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत शाळेसाठी अभिमानास्पद कामगिरी केली.
यात सूर्यदत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा ९४.८९ टक्के, कला शाखेचा ९७.४६ टक्के तर वाणिज्य शाखेचा ८४.८८ टक्के निकाल लागला आहे. तसेच सूर्यदत्त पब्लिक स्कुलच्या विज्ञान शाखेचा ९७.१४ टक्के, कला शाखेचा ९५.४१ टक्के तर वाणिज्य शाखेचा ८८.८२ टक्के निकाल लागला आहे. यावेळी सूर्यदत्तचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्ष व सचिव सुषमा चोरडिया, प्राचार्य किरण राव, शैला ओक यांनी शिक्षक, विद्यार्थी व पालक यांचे अभिनंदन केले.
यात सूर्यदत्त पब्लिक स्कुलच्या विज्ञान शाखेत अनुक्रमे अमोघ भागवत (९४.१७%), मंगेश गोसावी (९१.००%), सोहम लघाटे (९०.८३%), कला शाखेत शांभवी कुलकर्णी (९४.६७%), आस्था गांधी (९२.००%), रितिका देशपांडे(९०.६७%), वाणिज्य शाखेत वेदत्रयी खोडके (९२.१७%), सिद्धी ओक् (८९.६७%) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले. तसेच सुर्यादत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेत अनुक्रमे आराध्या कुलकर्णी (९१.६७%) आस्था कोंडे (९०.५०%) प्रेम नकाते (८७.५०%),कला शाखेत ज्ञानदा कुलकर्णी (८९.००%), फ्रेया जैन (८८.१७%) वैष्णवी पाटील (८७.००%), वाणिज्य शाखेत अनुक्रमे अनुज देशपांडे (८३.८३%), अनुष्का संकातला (८०.६७%) यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “बारावी हा मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा महत्वाचा टर्निंग पाँईंट असतो. त्यासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक सर्वच परिश्रम घेतात. त्यांच्या परिश्रमांचे चीज झाले याचा मला मनापासून आनंद आहे. त्यामुळे सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. मुलांनी भविष्याच्या वाटा विचारपूर्वक निवडाव्यात. बारावीनंतर विद्यार्थ्यांनी इतरत्र कुठेही प्रवेश घेतला, तरी हे विद्यार्थी व पालक सूर्यदत्त संस्थेशी कायम जोडलेले असतात. त्यांना हवे असलेले सर्व मार्गदर्शन सूर्यदत्ततर्फे केले जाते.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading