पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभरातील लाभार्थ्यांशी संवाद
चंद्रकांत पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आयोजन
पुणे : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने आठ वर्षे यशस्वीपणे पूर्ण झाली. यासाठी पंतप्रधानांनी गरीब कल्याण संमेलनातून सर्वाना मार्गदर्शन केले. तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून देशात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधला.
पंतप्रधानांनी गरीब कल्याण संमेलन कार्यक्रम पाहण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मधील जनसंपर्क कार्यालयात विशेष सुविधा केली होती. कोथरूडमधील सर्व लोकप्रतिनिधी, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग घेतला.
यावेळी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, शहर सरचिटणीस दीपक पोटे, शहर उपाध्यक्ष डॉ संदीप बुटाला, प्रशांत हरसुले, भाजपा शहर चिटणीस अनिता तलाठी, माजी शिक्षण समितीच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, माजी नगरसेविका हर्षाली माथवड, वासंती जाधव, छाया मारणे, माजी नगरसेवक जयंत भावे, किरण दगडे पाटील, राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, दिलीप उंबरकर, कोथरूड मंडल सरचिटणीस गिरीश भेलके, विठ्ठलआण्णा बराटे, दिनेश माथवड, अनुराधा एडके, उपाध्यक्ष रुपेश भोसले, कोथरूड मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे, उपाध्यक्षा पल्लवी गाडगीळ, युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, शिवराम मेंगडे यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.