रसिकांना अनुभवला शास्त्रीय गायनाचा परमोच्च ‘आनंद’
पं. आनंद भीमसेन जोशी यांच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला राग दरबारी कानडा मध्ये ‘झनक झनक बाजे रे बिछुआ’ ही रचना त्यांनी सादर केली. त्यानंतर त्यांनी राग कलावतीमध्ये समर्थ रामदासांची रचना आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आणि पं. भिमसेन जोशी यांनी आपल्या आवाजात अजरामर केलेले ‘माझे माहेर पंढरी’ हे अभंग सादर केले. ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’ आणि मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा या गीतांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
तसेच, पंडित आनंद भाटे यांनी सुरुवातीला दोन बंदिशी सादर केल्या. त्यानंतर संगीत सौभद्र नाटकातील वद जाउं कुणाला शरण हे नाट्य गीत सादर केले. संगीत तुलसीदास नाटकातील मन हो राम रंगी रंगले,आत्मरंगी रंगले ही रचना सादर करून त्यांनी रसिकांची मने जिंकली.संत तुकारामांची रचना याजसाठीं केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा रचनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.
