जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाचे वसतीगृह सुरु ठेवा, नाहीतर संबधित विद्यार्थ्यांना शैक्षणिक भत्ते लागु करा – छात्र भारती
पुणे : जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाचे वसतीगृह सुरु ठेवा, नाहीतर संबधित विद्यार्थ्यांना शैक्षणिक भत्ते लागु करा, या मागणीसाठी आज छात्रभारती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य सदस्य गणेश जोंधळे, जिल्हाध्यक्ष छाया काविरे, संघटक सम्राट पवार, सदस्य गणराज डोईफोडे, तुषार पानसरे आदी उपस्थित होते.
छाया काविरे म्हणाल्या,पुणे जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाचे वसतीगृह अनेक दिवस बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. संबधित विद्यार्थ्यांना शैक्षणिक भत्ते लागु करा ही आमची आज मागणी आहे. त्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी यांना आज निवेदन दिले आहे िल्हाधिकार्यांनी नक्की या मागणीचा विचार करावा, असे छाया काविरे म्हणाल्या.