fbpx
Wednesday, April 24, 2024
Latest NewsMAHARASHTRA

एल्गार परिषदे प्रकरणी अटकेत असलेल्यांची लवकरात लवकर सुटका करावी – चंद्रशेखर आजाद

पुणे : एल्गार परिषदेच्या प्रकरणात 12 जणांचे जीव गेले आहेत. तर काही लोकांना अटक सुद्धा झाली आहे. त्यावर मी आज नववर्षा निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकच मागणी करतो, की एल्गार परिषदेच्या प्रकरणात ज्या लोकांना अटक झाली आहे त्यांची लवकरात लवकर सुटका करावी, असे  राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद म्हणाले.

आज भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी चंद्रशेखर आझाद आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

चंद्रशेखर आझाद म्हणाले, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आम्ही जिंकून आल्यानंतर संविधानाचे रक्षण करण्याचे आमचे पहिले ध्येय आहे. उत्तर प्रदेश मध्ये भाजपने जसे काम केले आहे. त्याची दखल घेऊन भाजपने महाराष्ट्रात पण काम करावे, असे चंद्रशेखर आजाद म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, भीमा कोरेगाव येथील शेतकरी किती तरी दिवस पीडित होते. त्यांच्या मागण्या किती दिवस तरी प्रलंबित होत्या त्या पूर्ण झाल्या आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading