fbpx
Tuesday, May 14, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

मान्सूनचा परतीचा प्रवास वायव्य भारतातील काही भागांतून येत्या ६ ऑक्टोबरला सुरू होणार

पुणे:यंदा नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पडणाऱ्या पावसाच्या हंगामात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याचं भारतीय हवामान खात्यानं म्हटलं आहे. 1 जूनला या पावसाला सुरूवात होऊन जून ते सप्टेंबर कालावधीत देशभरात सर्वसाधारण सरासरीच्या 99 टक्के पाऊस झाला आहे. आता परतीच्या मान्सूनविषयी हवामान विभागाने माहिती दिली आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास वायव्य भारतातील काही भागांतून येत्या ६ ऑक्टोबरला सुरू होणार आहे. यामुळं होणाऱ्या परतीच्या पावसाविषयी चार आठवड्यांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

पहिल्या आठवड्यात देशाच्या पश्चिम, वायव्य आणि या भागांच्या आजूबाजूच्या मध्य भारतातील बहुतेक प्रदेशांमध्ये सर्वसाधारण प्रमाणाहून अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे. दुसऱ्या आठवड्यात देशाच्या मध्य भागातील राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण सर्वसाधारण प्रमाणाहून जास्त राहील. तर, वायव्य भागात हे प्रमाण सर्वसाधारण असेल. यानंतर देशातील वायव्य प्रदेशातील पावसाचं प्रमाण कमी होत जाईल.
यंदाचा नैऋत्य मान्सून हंगाम 1 जूनला सुरू झाला होता. तो ३० सप्टेंबरला संपत आहे. या हंगामात देशाच्या वायव्य भागात 96 टक्के, मध्य भागात 104 टक्के, पूर्व आणि ईशान्य भागांत 88 टक्के आणि दक्षिणेत 111 टक्के असं विभागनिहाय पावसाचं प्रमाण राहिलं आहे. यापैकी जून महिन्यात 110 टक्के पाऊस झाला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत पावसाचं प्रमाण अनुक्रमे 93 आणि 76 टक्के राहिलं. तर, सप्टेंबरमध्ये सर्वाधिक 135 टक्के पाऊस पडला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading